मुंबई(प्रतिनिधी):- भारतीय हवामान विभागाने
कोकण किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालघर, मुंबई, ठाणे यांना जिल्ह्याना २ जून ते ४ जून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना १ जून ते ४ जून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा किंवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागरिकांना सजग राहण्याचे आवहान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही ते म्हणाले.