मुंबई(प्रतिनिधी):- महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. कोकण किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. मच्छीमार बांधवांनी ४ दिवस समुद्रात जाऊ नये, असे ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रसह गुजरातला ‘हिका’ चक्रीवादळाचा धोका असल्याचे ‘सांयक्लोम मॅन’ नं माहिती दिली आहे. भारतातील हवामान विभागाने रविवारी अरबी समुद्रासाठी दुहेरी दबाच्या पट्ट्याचा अलर्ट जारी केला आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अधीच सुचना जारी केली आहे. राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामध्ये गुजरातसह महाराष्ट्राला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.