Maharashtra Loksabha : देशात लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी १९ एप्रिलला पहिला टप्पा आणि २६ एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला. आता आज मंगळवारी ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये ९३ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे.
महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या ११ मतदारसंघांसाठी सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाली आहे. राज्यातील बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, रायगड, सोलापूर, लातूर या मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये इंडिया आघाडी आणि भाजपामध्ये चुरस निर्माण झाली आहे. (Maharashtra Loksabha)
महाराष्ट्रातील काही मतदारसंघाकडे अवध्या देशाचे लक्ष लागले आहे. यामध्ये बारामती, कोल्हापूर, सांगलीसह आदी मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत नव्या पक्षांची अग्निपरीक्षा या टप्प्यात होत आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे
Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड
Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल
‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के
बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ‘या’ तारखांना करता येणार पोस्टल मतदान
भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका
अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप