Earthquake : महाराष्ट्रातील नागपुरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नागपूर जिल्ह्यात दुपारी अडीचच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ मोजण्यात आली आहे. उमरेड गावात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सलग तिसऱ्या दिवशी या परिसरात भुकंपाच्या धक्के (Earth earthquake) जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी २.४८ मिनिटांनी भूकंपाचे हलके धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू नागपूर जिल्ह्यातील उमरेड गावात असल्याचे सांगण्यात येत आहे.
महिन्याभरातील चौथा Earth earthquake
यापूर्वी ३ मे २०२४ रोजी नागपुरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते आणि त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.५ इतकी मोजली गेली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी आज म्हणजेच ५ मे रोजी भूकंपाचे धक्के जाणवले. या महिन्याभरात हा चौथा धक्का जाणवल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, यावर्षी २१ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्रातील हिंगोली येथे सकाळी ६.०८ वाजता ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि त्यानंतर काही वेळातच ३.६ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप अवघ्या ११ मिनिटांत म्हणजेच ६.१९ वाजता जाणवला.
हे ही वाचा :
भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका
अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप
कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे
ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई
मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट
ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन
धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना