अमरावती(प्रतिनिधी) :- केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज देशव्यापी निषेध दिवस म्हणून आंदोलन केले जात आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा, नांदगाव खंडेश्वरसह ग्रामीण भागात विविध ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दिवाळखोरीविरोधात आंदोलन करण्यात आले. तिवसा येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात किसान सभेचे जिल्हा सचिव महादेव गारपवार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश मोरघडे, जिल्हा सहसचिव शाम शिंदे, अनिल मारोटकर, दिलीप महल्ले आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.