वडवणी : बिचकुलदरा तांड्यातील एक २६ वर्षीय ऊसतोड मजुर गेल्या चार महिन्यांपासून कर्नाटक तसेच गढी कारखान्यावर ऊस तोडत होता. चार महीने ऊसतोड करुन तो कुटुंबासह घरी परतत असताना (ता.१६) दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान माजलगाव पिंपळनेर बीड रस्त्यावरील मुगगाव – पाटेगाव शिवारात शिवरस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली पडुन त्यांचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वडवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी वडवणी तालुक्यातील ऊसतोड मजूर गाव, घर व नातेवाईक सोडून हजारो कुटुंब ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच परराज्यात जातात. त्या ठिकाणचा ऊस संपल्यामुळे गेवराई तालुक्यातील जय भवानी साखर कारखाना गढी या ठिकाणी ऊसतोडीसाठी आले होते. आज ऊसतोडीचे काम संपवुन घरी परतत असतानाच काळाने त्या कुटुंबाच्या कर्त्या माणसावर काळाने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं.
वडवणी शहरापासून ३ कि.मी. आंतरावर असलेल्या बिचकुलदरा तांडा येथील विजय खिरू राठोड हा तरुण ऊसतोड मजूर गेल्या चार महिन्यांपासून कर्नाटक तसेच जय भवानी साखर कारखाना गडी याठिकाणी कुटुंबासह ऊसतोड करीत होता. मात्र (ता.16) रोजी तो मजूर ऊस तोडीचे काम संपून कुटुंबासह घरी परतत असताना बीड पिंपळनेर माजलगाव या मधल्या रस्त्यावरून गावी येत असताना या शिवारात ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.४४ एस.५५३६ ) या ट्रॉक्टरच्या ट्रॉली खाली पडुन त्याचा चिरडून मृत्यू दुर्दैवी झाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखीची असून त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी दोन मुले व एक मुलगी एक भाऊ असा परिवार आहे.