Friday, May 17, 2024
Homeग्रामीणरत्नागिरी : आदिवासी शिक्षकाचा लढा अद्यापही सुरूच, उद्या जिल्हा परिषद रत्नागिरी समोर...

रत्नागिरी : आदिवासी शिक्षकाचा लढा अद्यापही सुरूच, उद्या जिल्हा परिषद रत्नागिरी समोर 127 वे उपोषण

10 हजारापेक्षा जास्त निवेदने आणि स्मरणपत्रे देऊन न्यायासाठी लढा सुरुच


रत्नागिरी : आपल्या न्याय मागण्यांसाठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे 5 जानेवारी 2021 रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी समोर आपले 127 वे उपोषण आहे. उपोषणाचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.  

दोषी, भ्रष्टाचारी, षडयंत्रकारी व बोगस अपंग प्रमाणपत्रधारी दापोलीचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय दाजी बाईत व बोगस डिग्रीधारक दोषी तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी नंदलाल कचरू शिंदे या दोन्ही बोगस शिक्षण विस्तार अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा व माझी मुळ कागदपञे 2 लाख दंडाच्या रक्कम सह परत करा तसेच इतर 25 मागण्यांची तात्काळ पूर्तता करा.या मागणीसाठी परिषद आदर्श शाळा, सुकदर (ता. खेड) उपशिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे  जिल्हा परिषद रत्नागिरी समोर 127 वे उपोषण  आहे.

निवेदनात म्हटले आहे की, विजय दाजी बाईत हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी रूपये 22,000 घेणे, अनेक कामांसाठी शिक्षकांकडून आर्थिक  मागणी करणे, माझ्या विरोधात रचलेल्या षडयंत्र प्रकरणात स्वतः ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून जबरदस्तीने दमदाटी धमकी देऊन स्वतः लिहून ठेवलेल्या पञावर व बान्डपेपरवर सह्या करून घेणे, महिला कर्मचारी यांचा छळ करणे, शिक्षकांचे पगार जाणीवपूर्वक न काढणे इत्यादी गंभीर प्रकरणात दोषी ठरले आहेत. विजय बाईत दोषी ठरल्याचा चौकशी अहवाल गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली, गटविकास अधिकारी पंचायत समिती गुहागर, शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी या ञिसदस्य चौकशी समितीने दिनांक 4 ऑक्टोबर 2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केला आहे. 

विजय बाईत यांच्या विरोधातल्या दिनांक 29 ऑक्टोबर 2018 व दिनांक 4 जुलै 2018 रोजीच्या दोन्ही चौकशी अहवालात विजय बाईत हे दोषी ठरलेले आहेत. दिनांक 4 जुलै 2018 रोजीच्या विजय बाईत शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या चौकशीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद रत्नागिरी तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश जोशी यांच्यासह काही मंञी, राजकीय पदाधिकारी, समाजकंटक व पालकामार्फत विजय बाईत यांनी माझे विरोधात षडयंत्र रचून मला खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवले.

सदर षडयंञात खेडचे तत्कालीन  प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, जिल्हा परिषद रत्नागिरीचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश जोशी, दापोलीचे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी नंदलाल कचरू शिंदे, तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक चे एकनाथ आंबोकर यांच्यासह राजकीय पदाधिकारी समाजकंटकांचा हात असून दोषी बोगस अधिकारी यांना राजकीय मंञी व पदाधिकारी यांच्या दबावापोटी तत्कालीन व सध्याचे  शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी हे कारवाई करत नाहीत, असा आरोप सुशीलकुमार पावरा यांनी केला आहे.

तसेच माहिती अधिकार अर्ज कोर्टटिकीटसह फाडून फेकणे, अनेक ओरिजनल कागदपञे कार्यालयातून गायब करणे इत्यादी अनेक गंभीर प्रकरणात शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरीतील दोषी अधिकारी गुतलेले आहेत. हे दोषी अधिकारी एकामेकाला वाचविण्यासाठी माझ्यावरच उपोषणाचे क्षुल्लक कारण दाखवत कारवाई करून माझी कोंडी करतात, माझा अन्यायाविरोधातला आवाज जबरदस्तीने दाबतात, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

तसेच बनावट घटना प्रकारासंबंधीत अनेक तारखा खाडाखोड करून बदललेल्या सापडल्या. केंंद्रप्रमुख ता. खेड यांच्या अहवालानुसार घटना घडलीच नाही हे बनावटपणा दिसून आला आहे. बनावट अहवालात घटनेच्या तारखा बदल असलेला धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे दोषींना वाचविण्यासाठी काही गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यास जिल्हा परिषद रत्नागिरी प्रशासन टाळाटाळ करत आहे.

सबंधित मागण्यांना घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 10 दहा हजार पेक्षा अधिक निवेदन व स्मरणपञे दिलेली आहेत. तसेच 126 वेळा उपोषणे झाली आहेत. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण करतच राहणार असल्याचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय