Friday, May 17, 2024
Homeकृषीबीड येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मागण्या त्वरित मान्य करण्यासाठी विविध संघटनांची निदर्शने

बीड येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मागण्या त्वरित मान्य करण्यासाठी विविध संघटनांची निदर्शने

बीड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ऊसतोड कामगार संघटना (सीटू), भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (डीवायएफआय), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), शेतकरी संघर्ष समितीने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बीडमध्ये निदर्शने करून पाठिंबा दिला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मागील 7 – 8 दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन सुरु आहे. शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, या न्यायी हक्काच्या मागण्यांसाठी चाललेल्या संघर्षाला युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक सक्रीय पाठींबा देत असल्याचे, मोहन जाधव यांनी म्हंटले आहे.

नुकतेच २६ नोव्हेंबरला कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, तरुण आणि इतर सामान्य जनतेने आपल्या मागण्यांसाठी देशभरात आंदोलने केली. त्याच दिवसापासून हरियाणा, पंजाब आणि दिल्ली शेजारील राज्यातून शेतकरी दिल्लीकडे निघाले. तेव्हापासून ते आजपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. या आंदोलनाला देशातील हजारो ठिकाणांहून पाठींबा मिळाला आहे. आज देशभर शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला यांच्यासह युवक आणि विद्यार्थी देखील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले असल्याचे ही जाधव म्हणाले.

या आंदोलनात शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा आणि शेतकरी आंदोलनातील सर्व मागण्या मान्य करा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी डीवायएफआयचे राज्य सहसचिव व ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव, एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, प्रा. गणेश ढाकणे, प्रा. कुंडलिक खेत्री, दत्ता सौंदरमल, निहाल सर, कृष्णा मगर, सिध्दार्थ चव्हाण, शंकर चव्हाण आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय