Friday, May 10, 2024
Homeग्रामीणएसएफआयचे शिष्यवृत्तीसाठी वर्धा जिल्ह्यात आंदोलन

एसएफआयचे शिष्यवृत्तीसाठी वर्धा जिल्ह्यात आंदोलन

एसएफआयचे शिष्यवृत्तीसाठी वर्धा जिल्ह्यात आंदोलन

२ जून रोजी सामाजिक न्याय मंत्री यांना मेसेज करणार आणि ट्विटरवर सुद्धा एक मोहिम चालवली जाणार !

वर्धा:- (प्रतिनिधी)

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ने लॉकडाऊन काळात सरकारकडे सतत मागणी केली की, राज्यातील सर्व सर्व समाज घटकातील, सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती वितरित करा. तरीदेखील सरकारने या मुद्द्याकडे लक्ष दिलेले नाही. म्हणून एसएफआयने १ जून रोजी राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन करण्याची हाक सर्व विद्यार्थ्यांना आणि संघटनेच्या जिल्हा समित्यांना दिली होती. हे आंदोलन लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांनी आपल्या घरात, घराच्या परिसरात, गल्लीमध्ये करावे. यात  विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उतरावे, असे आवाहन एसएफआयने केले  होते याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील सर्व तालुका व युनिट पातळीवरील कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग नोंदवला.

एसएफआय राज्य कमिटीने १८ एप्रिल आणि २५ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले होते. परंतु अजूनही शिष्यवृत्ती जमा झालेली नाही. मागील शैक्षणिक वर्ष २०१९-२० संपले असूनही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण न होणे, हे सामाजिक न्याय विभागाच्या ढिसाळ नियोजनाचे लक्षण आहे. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मागास घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणजे दिलासा देणारी बाब आहे. म्हणून किमान या संकटाच्या काळात तरी सरकारने शिष्यवृत्तीचे वेळेत वाटप करणे आवश्यक होते. परंतु तसे झालेले नाही. म्हणून एसएफआयच्या वतीने सोमवारी १ जून रोजी राज्यभरात आंदोलन करण्याची हाक देण्यात आली होती.

दिनांक २ जुन रोजी सकाळी ११ वाजेपासून सामाजिक न्याय मंत्र्यांना राज्यातील विद्यार्थी मेसेज करतील. आणि त्यातून शिष्यवृत्ती वाटप करण्याची मागणी करतील. तसेच त्याच दिवशी संध्याकळी ५ ते ७ यावेळेत ट्विटरवर हॅशटॅगचा वापर करून एक मोहीम चालवली जाणार आहे.

यामध्ये जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी आणि एसएफआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. असे आवाहन एसएफआय वर्धा जिल्हा कमिटी वतीने राज्य सचिव मंडळ सदस्य राहुल खंडाळकर, राज्य कमिटी सदस्य मोनाली मेश्राम, जिल्हा अध्यक्ष प्रिया वाडेकर, जिल्हा सचिव प्रियांका मेश्राम,कैलास पडोळे, श्रद्धा वाडेकर, वैशाली वरठी, रोशन नवघरे, रेणुका वाडेकर, कल्याणी कांबळे अलिश मानकर, प्रतीक्षा नेहारे,अश्विनी नासरे, श्रावण खांडेकर, स्वरीत काकडे, अश्विनी सोनूले इत्यादी

करत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय