राजगुरूनगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राजगुरूनगर येथील सभेत मोठा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाचं आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारनं आमचीच माणसं आमच्या अंगावर सोडली आहेत.
आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला आहे. ती मुदत २४ ऑक्टोबरला संपतेय. मराठ्यांच्या लेकरांना पुढे येण्यासाठी आरक्षणाची गरज आहे, इतर लोकांना एका रात्रीतून आरक्षण मिळालं, मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की पुरावे द्यावे लागतात.
सरकार समित्या स्थापन करते, मात्र आता आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.असा इशारा त्यांनी राज्यसरकारला राजगुरूनगर,पुणे येथील जाहीर सभेत दिला.
१०० एकर जागेवर मनोज जरांगे पाटील यांची ही सभा सुरू असताना मोठा जनसमुदाय येथे उपस्थित होता.