Junnar : शिरूर लोकसभा मतदार संघाचे बळीराजा पार्टीचे अधिकृत उमेदवार त्रिंबक नारायण कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण असलेले शिवनेरी किल्ला येथे जाऊन अभिवादन केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण निवडणूक का लढवत आहे ? आपले निवडणुकीचे मुद्दे कोणते आहेत हे स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. (Junnar)
बळीराजा पार्टीचे उमेदवार त्रिंबक कांबळे म्हणाले की, समाजाची दुरावस्था झाली असून वर्षोनुवर्षे लाईनला थांबून आपण त्यांना मतदान देतो मात्र ते आपल्या मताचा बाजार करत आहेत. लोकसभेत विधानसभेत लोकांच्या मतांची किंमत केली जात नाही. लोकांच्या मताचा लिलाव केला जातो असे सांगताना कांबळे म्हणाले की, वोट की गॅरंटी देणार म्हणजे जसे आमदार खासदारांनी सरकार बनवण्यासाठी मत दिलेले ते कधीही माघारी घेऊन सरकार पाडतात तसेच जनता सुध्दा मला दिलेलं मत कधीही माघारी घेऊन माझा राजीनामा घेण्याचा अधिकार मी देणार.
पुढे बोलताना कांबळे यांनी आपण निवडून आल्यास शेतकऱ्यांना २४ तास लाईटची तरतूद करणार, शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी सदैव कटीबध्द राहणार, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाय योजना आखणार, पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण मोफत दिले जाणार, मतदार संघ खड्डे मुक्त करणार, ठेकदारी आणि कॉन्ट्रक्ट पध्दत पुर्णपणे बंद करणार, १९६२ सालीचा तुकडे बंदिचा कायदा रद्द करणार असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान
राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान
बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप
‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक
TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती
मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे
Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड