बीड : सुरुडी व किनी येथे मानवी हल्ला केलेल्या बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी वन विभागाने एकूण 17 टीम स्थापन केल्या आहेत. त्यामध्ये औरंगाबाद ,अमरावती, नांदेड व इतर 1 अशा एकूण चार वन्यजीव व्यवस्थापनामध्ये तज्ञ असणाऱ्या टीमचा ही समावेश असून एकूण ८० कर्मचारी यात सक्रीय आहेत.
तसेच आजूबाजूच्या गावामध्ये या टीमद्वारे पेट्रोलिंग करून बिबट्याचा मागोवा घेण्याचे व सुरक्षितता बाळगण्यासाठी प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ६ पिंजरे लावण्यात आले आहेत. उद्या आणखी दोन पिंजरे लावण्यात येणार आहेत. लवकरच यशस्वीपणे जेरबंद करू, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.