Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणकिसान सभेच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे, लोकांच्या हाताला मिळाले काम!

किसान सभेच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे, लोकांच्या हाताला मिळाले काम!

 किसान सभेच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे, लोकांच्या हाताला मिळाले काम!

सावरली ( दि.१९) : आंबेगाव तालुक्यातील सावरली गावात रोजगार हमीचे काम सुरू झाले आहे,जिल्हापरिषदने तयार केलेल्या रस्त्याचे गटार खोदने, व मुरूम रस्त्यावर पसरवणे हे काम  येथे सुरू आहे.या नंतर या मुरूमावरून रोलर पण फिरवला जाऊन, रस्ता मजबूत केला जाणार आहे,किमान महिनाभर मजुरांना काम मिळेल. येवढं या रस्त्याचे काम असणार आहे.आजपासून या रोजगार हमीच्या  कामावर १६ ते १८ मजूर कामावर येत आहेत.’या कामामुळे गावच्या रस्त्याचे काम मजबूत होऊन विकासाला हातभार तर लागणार, पण लोकांना गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे.’असे यावेळी किसान सभेचे तालुका सचिव अशोक पेकारी यांनी सांगितले.यावेळी मजुरांनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, यांचे सहकार्य मोलाचे राहिले,ज्यांनी- ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सर्वांचे आभार मानले.

हे काम मिळवून देण्यात सुनिल पेकारी,बारखू केंगले, सुभाष भांगरे, श्रावण पेकारी,व गावातील सर्वच लोकांचे सहकार्य मोलाचे राहिले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय