प्रतिनिधी :- राज्याला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून कोकणातील जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज निसर्ग चक्रीवादळाने उद्भवलेल्या परिस्थितीत राज्य सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास देत तातडीची मदत जाहीर केली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज निसर्ग चक्रीवादळाने उद्भवलेल्या परिस्थितीत राज्य सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास दिला. तसेच त्यांनी रायगड जिल्ह्याव्यतिरिक्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तातडीची मदत जाहीर केली.#CycloneNisarga pic.twitter.com/ZFULISk0cF
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 7, 2020
मुख्यमंत्र्यांनी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हांंसाठी अनुक्रमे १०० कोटी, ७५ कोटी, २५ कोटी तातडीची मदत जाहीर केली आहे.