ता. शिरोळ (कोल्हापूर):
देशात कोरोनाने कहर केला आहे, सर्व उद्योग धंदे बंद आहेत, लोकांचे खायचे हाल आहेत गेली तीन महिने शेतमजुरांच्या हाताला काम नाही नसल्याने जगण्याची परिस्थिती अवघड होत चालली आहे, शिरोळ तालुक्यातील शेतमजूरांची संख्या अधिक आहे. त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असल्याने शिरोळे तालुक्यातील गोर गरिबांची तीन महिन्यांची वीज बिल माफ करण्याची मागणी मनसेचे शिरोळ तालुका अध्यक्षा शकुंतला कांबळे यांनी केले आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी तहसील दारांना दिले आहे.