Sunday, April 28, 2024
Homeराज्यशासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून महाराष्ट्र शासनाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून महाराष्ट्र शासनाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई(प्रतिनिधी) :- कोरोनाच्या साथीमध्ये सर्वेक्षण , शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदत कार्य यांचेशी संबंधित कर्तव्य बजावित असताना शासनाच्या विविध विभागातील, प्रवर्गातील कर्मचारी यांचा कोरोना विषाणूशी जवळून संबंध येत आहे . अशा कर्मचाऱ्यांंच्या दृष्टीने शासनाने ५० लाख रकमेचे सर्वंकष वैयक्तिक अपघात विमा कवच पुरविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या बाबतची कार्यपध्दती विमा कंपन्यांशी विचार विनिमय करून अंतिम करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयामध्ये म्हटले आहे.

५० लाख रूपये आरोग्य विमाच्या यांना होणार लाभ 

         आरोग्य सेवा संबंधित कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, आंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागांचे कर्मचारी मोठ्या कोव्हीड-१९ बाबत जबाबदारी पार पाडत आहे. त्यांना याचा लाभ होणार आहे.

विमा योजना कार्यान्वित होईपर्यंत अंतरिम अंतरिम उपाययोजना म्हणून कोव्हिड विषयक कर्तव्यावरील  कर्मचाऱ्यांंच्या मृत्यूच्या सर्व प्रकरणी ५० लाख रकमेचे सानुग्रह सहाय्य खालील अटींच्या अधीन प्रदान करण्यात येेणार आहे. 


 १. सदर कर्मचारी त्याच्या इस्पितळात दाखल होण्याच्या अथवा मृत्यूच्या दिनांकांपूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर असला पाहिजे . 

 २. सदर मृत्यू कोव्हिड -१९ शी संबंधित असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणन, शासकीय-पालिका-महानगरपालिका, आय.सी.एम.आर नोंदणीकृत खाजगी इस्पितळ-प्रयोगशाळा यांचेकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात येईल.

 ३. “कर्मचारी” यांमध्ये सर्व कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले, रोजंदारी, मानसेवी कर्मचाऱ्याचा समावेश असणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय