मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक झपाट्यांने वाढत आहे. दिवसेंदिवस मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे. याचं पार्श्वभूमीवर राज्य सरकारन कडक निर्बंध लावले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत असल्या, तरीही कोरोना रोखण्यात अजूनही यश आलेले नाही, त्यामुुळे राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरु आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांत वास्तव्यास असलेले स्थलांतरित कामगार पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत.
दादर, मुंबई सेंट्रल, कुर्ला टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि बोरवली येथे आपल्या मूळ गावी जाणाऱ्या ट्रेन पकडण्यासाठी स्थलांतरित कामगार दाखल होत असून, यात दिवसागणिक भरत पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.