Saturday, April 27, 2024
Homeविशेष लेखChavdar Tale विशेष लेख : 20 मार्च चवदार तळे सत्याग्रह ; मानवमुक्तीचा...

Chavdar Tale विशेष लेख : 20 मार्च चवदार तळे सत्याग्रह ; मानवमुक्तीचा संगर

बाबासाहेबांच्या चळवळीमुळे आता अस्पृश्यांचा आत्मसन्मान हळू हळून जागा होऊ लागला होता. लोकं रस्त्यानी चालताना मान वर करुन चालु लागली. या भुमीत हजारो वर्षानी हे पहिल्यांदाच घडत होतं. संवर्णांपेक्षा आपण कणभरही कमी नाही याची काही लोकाना जाणीव झाली अन ते जागृतीचं काम करत फिरु लागले. प्रत्येकाला आता गुलामगिरीची जाणीव होऊ लागली. आता सगळा समाज गुलामगिरी झटकून टाकायच्या तयारीला लागला होता. स्वत:च्या कार्यक्षमतेचा साक्षात्कार होऊ लागला. आता बंडखोर वृत्ती गुलामगिरीची जागा घेऊ लागली. या व्यवस्थेचा जनसामान्याना तिटकारा वाटू लागला. असे वाटणे परिवर्तनाची प्राथमिक अवस्था असते. एकूण अस्पृश्य समाज या अवस्थेला येऊन पोहचला होता. आता नवि क्रांती घडणे अटळ होते. पण ही सामाजिक क्रांती एकही रक्ताचा थेंब न सांडता घडावा यासाठी बाबासाहेबांनी चळवळीवर करडी नजर नि आंबेडकरी शिस्त या दोन्ही गोष्टींचा प्रभावी पहारा लावला होता.(Chavdar Tale )

याच दरम्यान महाड नगरपालिकेनी सिताराम केशव बोले यानी विधिमंडळात पास करुन घेतलेल्या ठरावाची अमलबजावनी करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णया प्रमाणे महाड नगरपालिने आपल्या अधिकारातील चवदार तळे हे अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आल्याची घोषणा केली. ही घोषणा होताच अस्पृश्यांचा वस्तीत जल्लोष उडाला. आता चवदार तळ्याचे पाणी चाखता येईला या आनंदाने लोकांनी जणू उत्सव साजरा केला. कायद्याने बहाल केलेला अधिकार बजाविण्यासाठी महार वाड्यातुन बायका पोरी मडकी, हंडे घेऊन तळ्यावर पोहचली. पण मनुचे प्रतिनिधी फार कर्मठ. त्यानी महाराना तळ्यावरील पाणी घेण्यास मज्जाव केला. बिचा-या पिडित अस्पृश्यांमधे एवढा हिंमत कुठे होता की ठणकावून आपले हक्क बजावतील. संवर्णांची शिवीगाळ खाऊन माना खाली घालुन तमाम लोकं पाणि न घेताच परतली. झालेल्या प्रकारामुळे सगळा गाव खदखदत होता. ईकडे अस्पृश्य हक्क न मिळाल्यामुळे तर तिकडे संवर्ण अस्पृश्य माजलेत म्हणून धुसफुसत होते. आग दोन्हिकडे लागली होती. एका बाजूला अधिकारासाठी तर दुसरी मनुवादी वर्चस्व टिकविण्यासाठी. अन हा हा म्हणता ही बातमी बाबासाहेबांच्या कानावर पडली. बाबासाहेब अत्यंत विशिण्ण मनस्थीतीने सगळा प्रकार ऐकला. मन विदिर्ण झाले. हा संवर्णांचा घोर अपराध होता. ज्या तळ्यातील पाणी गुरा ढोरांसाठी उघडे होते, मुसलमान व ख्रीश्चनांसाठी उघडे होते. प्राण्या पक्ष्यांसाठी उघडे होते पण आपल्याच समाजातील अस्पृश्य बांधवाना मात्र हे पाणी नाकरण्यात आले होते. संवर्णांद्वारे अस्पृश्यांना तिथे अटकाव घालण्यात आला होता. हे सगळं ऐकून बाबासाहेब फार संतापले. आज कायद्यानी तो अधिकार दिल्यावर मनुवाद्यानी अटकाव करण्याचे काहीच कारण नव्हते. तरी वर्चस्वाची मस्ती इतकी होती की त्यातून यांनी हे प्रताप केले होते. या सगळ्या प्रकाराणे संतापलेल्या बाबासाहेबानी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला व त्या अनुषंगाणे घोषण केली. चवदार तळ्याचे पानी चाखणे हा अस्पृश्याना कायद्याने दिलेला अधिकार आहे व तो आपण कुठल्याही किमतीत बजावायचाच. आपण १९ व २० मार्च १९२७ ला महाडला चवदार तळ्याचे पाणी चाखण्यासाठी सत्यग्रह करणार असून, ते स्वत: तिथे जातीने हजर राहून आपला अधिकार बजाविणार अशी भीम गर्जना केली.(Chavdar Tale )


या भीम गर्जनेची डरकाळी देशभर गेली. लाखो लोकांच्या अंगात वीज चमकून जावी अन त्याला प्रतिसाद म्हणून देशभरातून भीम लाट उसळावी असा तो प्रकर होता. बाबासाहेब स्वत: तळ्याच्या सत्याग्रहात उतरताहेत म्हटल्यावर काना कोप-यातून कार्यकर्तेही उसळणार होते. या घोषणेतून तमाम कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुनीत झाला. जिकडे तिकडे लोकानी या चळवळीत भाग घेण्यासाठी तय्यारी चालविली. सुरभा टिपणीस, सुभेदार सवादकर, संभाजी गायकवाड, शिवराम जाधव, अनंतराव चित्रे, रामचंद्र मोरे या अस्पृश्य पुढा-यानी आपली सगळी ताकत एकवटुन गावोगावी प्रचार चालविला. लोकाना दोन दिवस महाड सत्याग्रहास हजेरी लावण्याचे सांगण्यात येऊ लागले. तमाम जनतेत बाबासाहेबांच्या या निर्णयामुळे एक जल्लोष उडाला होता. आज आपल्या महान नेत्याने पुकारलेल्या पहिल्या वहिल्या जाहीर लढाईत भाग घेण्याची संधी कोणीच गमवायला तयार नव्हता. बघता बघता १९ मार्च हा दिवस जवळ येऊ लागला. ही दरिद्र्यांची, पिचलेल्या, दबलेल्या लोकांची सभा होती. इतर कोणत्याही सभेपेक्षा ही सभा सर्वार्थाने वेगळी होती. येणारी लोकं हजारो वर्षाच्या काळोखात जिवन व्यथीत करुन स्वाभिमान हरविलेली, दिशाहीन, विद्याहीन, परिस्थीतीने दीन तर सामाजातील स्थानी अत्यंत हीन या सगळ्या अवस्थांतून जाणारी ही माणसं महाडात जमणार होती. येण्यासाठी हातात पैसे नव्हते म्हणून एक आठवडा आधीच पायी निघालेली कित्येक लोकं हळू हळू महाडला उतरत होती. बघता बघता १९ मार्च उजाडला अन हजारोच्या संखेनी पाठीवर भाकरीची शिदोरी बांधुन अस्पृश्यानी महाडला हजेरी लावली होती.(Chavdar Tale)

चवदार तळ्यापासून दोन फर्लांग अंतरावर एक विराट असे मंडप उभारण्यात आले होते. येथेच आमच्या अस्पृश्य बांधवांचा मुक्काम होता अन परिषदही ईथेच भरणार होती. गावातील संवर्णांमधे धुसफुस सुरु होतीच. अस्पृश्यांच्या अफाट लोकसमुदायाच्या लाटा बघुन त्यांचे धाबे दणाणले होते. ही चळवळ फसावी म्हणून तिथल्या संवर्णानी असहकार करायचे ठरविले होते. ईतक्या लोकाना पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणणू लागली. ईतर वेळी मंदीरांच्या पुजेत किंवा इतर समाज कार्यात सढळ हातानी दाण करुन पुण्य कमविणारे संवर्ण आपल्याच बांधवांना मात्र पैशानीही पाणी देण्यास तयार नव्हते. शेवटी बरीच खटपट करुन ४० रुपये खर्ची घालुन पाणी घेण्यात आले. आलेल्यांची पाण्याची गरज भागली अन या सत्याग्रहाचा पहिला दिवस सुरु झाला. तो दिवस म्हणजे १९ मार्च १९२७ होता. या दिवशी महाड सत्याग्रहाची सभा नियोजित तंबुत सुरु झाली. श्री. संभाजी गायकवाड हे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्या भाषणाने परिषदेची सुरुवात झाली. पुढे बसलेली जनता ही फाटक्या कपड्याची, दारिद्र्यानी पछाडलेली व आत्मसन्मान गमावलेली होती. पण आज या परिषदेत हजेरी लावुन हे सगळं झिटाकरण्याची तयारी असल्याचा व माणूस म्हणून जगण्याचा निर्धार केल्याचा पुरावा देत होती. अशा या गरीब व शोषित बांधवांच्या सभेत सुरुवातीची काही भाषणं झाल्यावर बाबासाहेब भाषणास उभे राहतात. पांढरा शुभ्र बंगाली धोतर, सदरा व कोट असा त्यांचा पेहराव होता. बाबासाहेब उभं राहताच टाळ्यांच्या कडकडाटाने अख्खं मंडप दुमदुमलं. बाबासाहेबानी आपले भाषण चालु केले.(Chavdar Tale )


“आम्ही सरकारला नेहमी अनुकुल असतो म्हणुन आमची उपेक्षा होते. आपण नेहमी झुकतं माप घेतल्यामुळे आमचा कोणी विचारच करित नाहीत. महाराना लष्करभर्ती बंदी याचाच एक नमुना आहे. आपल्यावरील ही बंदी जरी ईथल्या संवर्णांच्या सांगण्यावरुन लादली असली तरी इंग्रजानी असं डोकं गहाण ठेवण्याचं मुख्य कारण ते नाही, तर आम्हीच आहोत. आपण आपल्या अधिकारासाठी केंव्हाच ठणकावून उभे रहात नाही म्हणून आपल्यवर आज ही वेळ आली आहे. सरकार जरी इंग्रजांच असलं तरी अधिकारीवर्ग मुख्य भुमिका बजावत असतो. तुम्ही आता शिक्षणाची कास धरा. सरकार दरबारी उच्च पदस्थ अधिकारी म्हणून जा. अन आपल्या अधिकारांची अमलबजावणी करा. या महाडमधेच बघा ना, आज नगरपालिकेनी हे तळे आपल्यासाठी जरी खुले केले तरी आज आपल्याला ईथे अटकाव होतो. तेच जर आपले अधिकारी येथे वरिष्ठस्थानी बसलेले असते तर ही वेळ आलीच नसती. म्हणून आपला माणूस सरकार दरबारी वरिष्ठ पदावर असणे गरजेचे आहे. ४ थी शिकलेल्या ४० जणांपेक्षा बी. ए. झालेला एक माणुस मला जास्त महत्वाचा वाट्तो. म्हणून सगळ्यानी जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा निर्धार करावा. मृत जनावरांचे मांस खाणे आता सोडुन दया. महाराना गावात इज्जत नाही कारण आपल्यात स्वाभिमान नाही. स्वाभिमानाने जगायला शिका अन पोरा बाळाना शाळेत धाडा. महारानी आता वतनाचा लोभ सोडुन दयावा अन शेतीकडे वळावे. जंगलातील शेती मिळवावी अन स्वत: पिकविणारा अन्नदाता बनावे.” अशा प्रकारचं महारांमधे नवचैतन्य भरणारं एक जबरदस्त भाषण देऊन त्या दिवसाची सभा संपली.

त्या रात्री बाबासाहेब व इतर कार्यकर्ते टिपणीसांच्या घरी बसून दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवित होते. दुस-या दिवशी गावातील काही पुढारी जे स्वत:ला पुरोगामी समजतात ते परिषदेस हजेरी लावणार होते. या पुढा-यांच्या मदतीने ऐन वेळेवर तळ्याचे पाणी चाखण्याचा प्रस्ताव पुढे करुन तळ्यातील पाणी पिण्याचं ठरलं. महाड नगरपालिकेच्या ठरावाला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा एकंदरीत आराखडा तयार झाला. दुस-या दिवशी परिषद सुरु झाली. गावातिल पुरोगामी पुढारीही ठरल्या प्रमाणे आलेत. त्याना मोठया तो-यात भाषणही ठोकही. आम्ही कसे सुधारनेला पांठिंबा देत आहोत हे त्यानी आपल्या भाषणात ठणकावुन सांगितले. पण काही तासांतच त्याना प्रत्यक्ष कृतीतुन हे सिद्ध करण्याचं आव्हान पुढे उभं ठाकेल याचा अंदाज नव्हता. आपला भोपळा ईथेच फुटणार याची जाणिव नसल्यामुळे वाट्टेल ते ठोकम ठाक चालू होतं. दुपार पर्यंत सगळ्यांची भाषणे संपली अन त्या अनुषंगाने आजुन नविन ४ ठराव या परिषदेत पास करुन घेण्यात आलेत. अन आता परिषदेचे कामकाज संपणार अशी घोषणा होत असतानाच ठरल्या प्रमाणे व पुर्व संकेतानी अनंतरव चित्रे ताडकन उठुन “आपण महाड नगरपालिकेचा ठराव अमलात आणू या” अशी गुगली टाकली. हे वाक्य ऐकुन परिषदेस कोसो दुरचा पायी अंतर कापून आलेला प्रत्येक अस्पृश्य सुखावला अन टाळ्यांचा कडकडाट झाला.(Chavdar Tale Satyagraha)


याच्या अगदी उलटं स्पृश्य नेत्यांचे मात्र धाबे दणाणले. त्यानी या प्रत्यक्ष कृतीस नकार दिला. यामुळे संवर्णाचा रोष ओढवुन घेण्याची त्यांची तयारी नव्हती. लोकांच्या मताच्या विरोधातजाऊन काहिही करण्याची त्यांची तयारी नव्हती. महारानी तळ्याला हात लावल्यास संवर्ण उठाव करतील याचा त्याना अंदाज होता. त्यानी वेळ साधुन मागच्या दारातुन पळ काढला व आता काहीवेळापुर्वी भाषणातुन अस्पृश्य निवारणाच्या ज्या बढाया मारल्या त्या उघड पडल्या. परत एकदा अस्पृश्यांच्या प्रश्ना बद्दल पुरोगामी म्हणविणा-या लोकांमध्ये असलेले ढोंग बाहेर पडले. अगदी असेच ढोंगी तिकडे गांधीच्या ऐसपैस गोळा होऊन येणा-या काळात हरिजन चळवळ उभी करतात व तमाम अस्पृश्यांची दिशाभूल करतात. म्हणून बाबासाहेब नेमहीच म्हणायचे की दाईच्या हाताचा व आईचा हाताचा स्पर्श वेगळा असतो.

तर पुरोगामित्वाचा आव आणणारी तमाम मंडळी धूम ठोकल्यावर ठरल्या प्रमाणे वरील सगळी सत्याग्रही मंडळी बाबासाहेबांसोबत तळ्याच्या दिशेन कूच करतात. त्यांच्या मागून अस्पृश्य समाजाचा जनसमुदायही तळ्याच्या काठावर येतो. बाबासाहेब पुढे होऊन तळयातील पाणी ओंजळीत धरतात. तेंव्हा ते ओंजळीतले पाणी पाहुन त्यांचे डोळे पानावले. ओंजळभर पाणी घेऊन बाबासाहेब म्हणतात “हे तेच पाणी…., जे सगळ्या प्राणिमात्रांना, कुत्र्या मांजराना व गुरा ढोराना उघड आहे पण मला व माझ्या बांधवाना याचा स्पर्श एवढे वर्ष वर्ज होता. मात्र मी याला नुसता स्पर्श करणार नाही तर हे प्राशन करतो” असे म्हणत त्यानी ओंजळीतले पाणी प्राशन केले. अन आपल्या समस्त बांधवांसाठी हे तळे आजपासुन खुले आहे, तो आपला अधिकार आहे सगळ्यानी पाणी प्यावा असे आवाहन करताच लोकानी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढली अन आज चवदार तळ्याचे पाणी चाखले. हा पाणी चाखण्याचा दिवस होता २० मार्च १९२७…. हा खरा खुरा सोन्याचा दिवस होता. म्हणायला जरी ही पाण्याची गोष्ट असली तरी पाणीशी काही देणेघेणे नव्हते. हा आत्मसन्मानाचा प्रश्न होता. गायी ढोरांपेक्षा खालचा दर्जा समाजानी लादला तो झुगारण्याचा लढा होता. माणूस म्हणून स्वत:चं अस्तित्व दाखविण्याचा लढा होता. तो लढा आजवर कधीच लढला गेला नव्हता. कारण त्याची जाण करवून देणारा पैदा व्हायचा होता. आज मात्र तो भीम ईथे लढा उभारायला जातीने आला होता व इथून पुढे निळ्या क्रांतीचा नवा इतिहास घडणार होता. येणा-या निळ्या चळवळीची ही पहिली डरकाळी होती. ती अशी सुरु झाली. तर… तळ्यातील पाणी पिल्यावर परिषद संपल्याची व यशस्वी झाल्याची घोषण होते अन सगळे अस्पृश्य आपापल्या गावाच्या दिशेने निघतात. बाबासाहेब दोन दिवसापासुन सरकारी डॉक हाऊस मधे मुक्कामी होते. बरीच लोकं मिळेल त्या वाहनानी गावाकडे निघाले. कित्येक लोकंतर पायीच निघाली. पण ज्यांचा दुरचा प्रवास होता किंवा सायंकाळी वगैरे गाडी धरायची होती अशी लोकं आजुन त्या तंबुतच होती.(Chavdar Tale Satyagraha)

इकडे मात्र महारानी तळे बाटविल्याची बातमी गावात विस्तवासारखी पसरली. महार नुसतं तळे बाटवून शांत बसणार नाहीत तर ते आता गावातील वीरेश्वर मंदीरातही प्रवेश करणार अशी अफवा पसरविण्यात आली. चहुकडे धर्मावर घाला घातल्याची वार्ता पसरत होती. आंबेडकरानी धर्मावर घाला घातल्याच्या बातमिने सगळा संवर्ण समाज पेटुन उठला. लाठ्या काठ्या घेऊन हिंदु लोकं तळ्याकाठच्या मंडपात धडकले. आता तशिही मंडपात फारशी लोकं नव्हतीच. होते ते निघून गेले होते. उरले सुरले लोकं गावत गेले होते. बायका व मुलं फक्त मंडपात होती व जोडीला काही पुरुष मंडली होती. निघायच्या तयारीत असणारा बांधव आवराआवरी करत होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निहत्ता होता. पण याच्या अगदी उलट बाटविल्याचा बदला घेण्यासाठी आलेला संवर्ण सामाज मात्र खवळलेला तर होताच पण मारापिटी करण्याच्या जय्यत तयारीनेच आला होता. निहेत्ते लोकांना पाहून त्याला अजुन जोर चढला व तंबूत बसलेल्या अस्पृश्यांना बेदम मारहाण सुरु झाली. दिसेल त्याला फोडून काढले जाऊ लागले. मुला बायकांच्या किंकाळ्या गुंजू लागल्या. सगळ्याना पळपळू मारणे सुरु झाले. पुरुषांना तर मातीत लोळवू लोळवू मारायला लागले. लाथा बुक्या व लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाणी सुरु झाली. तिथे उपस्थीत पुरुषांची डोकी फुटोस्त्वर मारण्यात आले. सभा मंडपात जिकडे तिकडे अस्पृश्यलोकांची दाणादाण उडविण्यात आली. शिजत असलेल्या अन्नात वाळु मिसळण्यात आली. तळ्याच्या शेजारी रक्ताचा लोट वाहु लागला. चवदार तळ्याचे पाण्य आता महारांच्या रक्ताने लाल होऊ लागले. कित्येक लोकानी मुसलमान बांधवांच्या घरात शिरुन त्यांची मदत घेतली व आपला जीव वाचविला. अशा प्रकारे अमानुष मारहाण करुन संर्वर्णानी पळ काढला.

तिकडे बाबासाहेब डॉक बंगल्यात या सगळ्या घटनेपासुन अनभिज्ञ, परिषद सफल झाल्याच्या आनंदात होते. पण काही क्षणातच ईथे घडलेला सगळा प्रकार बाबासाहेबाना कळविण्यात आला. बाबासाहेबानी कार्यकर्त्यासकट थेट सभा मंडपात धाव घेतली. बघतात काय तर, जिकडे तिकडे घायाळ अवस्थेत पडलेले आपले बांधव दु:खानी किंचाळत होते. हे सगळं दृश्य पाहुन बाबासाहेब अत्यंत संतापले. पण ही वेळ रागावण्यात घाविण्याची नव्हती. जखमिना दवाखान्यात नेण्यात आले. बाबासाहेबानी स्वत: २० घायाळाना दवाखान्यात दाखल केले. तिथेही संवर्णच होते. हे संवर्ण डॉक्टर त्यांच्य पेशाला न शोभणारे शेरे मारत होते. पाणी हवे होते, घ्या आता इंजेक्शन. खुप माजलात तुम्ही त्या आंबेडकरांमुळे असले टोमणे व हिणकस शेरे मारत उपचार केला.

बाबासाहेबाना त्याच सायंकाळी डॉक बंगला खाली करुन दयायचा होता. त्यातच ही हाणामारी व अनेक जण जखमी झाल्यामुळे त्यानी आजुन दोन दिवस ईथेच थांबुन आपल्या बांधवांची काळजी घेण्याचे ठरविले. सायंकाळी मामलेदर व पोलिस अधिकारी डॉक बंगल्यावर बाबासाहेबांची भेट घेतली. झालेल्या प्रकरणा बद्दल दिलगिरी व्यक्त केली. बाबासाहेब मुद्दा पेटवतील की कसे याचा अंदाज येत नव्हता. त्यांनी तशी चिंता व्यक्त करुन दाखविली. तेंव्हाचे बाबासाहेबांचे वाक्य आहेत “मला झगडा पेटवायचा नाही. तुम्ही इतराना आवरा, मी माझी माणसे आवरतो.” ही प्रगल्भता, ही समयसुचकता व दाखविलेला संयमबाबासाहेबांच्या महान व्यक्तिमत्वाचं दर्शन घडविणारं तर होताच. पण येणारा लढा मैदाना हातघाईने नाही तर सत्याग्रहाच्या मार्गाने देशव्यापी होणार नि नव्या क्रांतीची पहाट होईस्तोवर लढल्या जाणारा याचाही संकेत होता. स्वभावातील काही गोष्टी भविष्याची नांदी देत असतात. इथे बाबासाहेबांनी दाखविलेला संयम अधीच जोमाने लढण्याचा संकेत सोडून गेला.

ईकडे डॉक बंगल्यावर लोकांची गर्दी वाढु लागली. हजारोनी गावाच्या दिशेनी जायला निघालेली पाऊले बातमी कळताच महाडच्या दिशेनी परत फिरली. महारांनी आज उभ्या महाडला मनगटातील पाणी पाजण्याचा निर्धार केला होता. अख्या संवर्णाना महाराच्या बाहुंचा बळ काय असतो ते दाखविण्याची तयारी होऊ लागली. सभा मंडपात मोठा विस्फोट आकार घेऊ लागला. एक छोटासा अविवेक महाडला भस्म करु शकत होता. पण बाबासाहेब मात्र फार संयमी. खरंतर बाबासाहेब स्वभावाने प्रचंड तापट व्यक्ती होते, पण ते अविवेकी नव्हते. शिघ्रकोपी असणे नि विवेकी असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. अन बाबासाहेबांत त्या दोन्ही गोष्टी होत्या. विवेक नेहमीच तापटापणाला नियंत्रणात ठेवत असतो. ईथे आज अटीतटीची वेळ निर्माण झाली होती व अख्या महाडला राख करण्यासाठी भीमसेना सज्ज होती. पण बाबासाहेबांनी अत्यंत विवेकाने वागत सगळ्या कार्यर्त्याना धीर धरण्याचा व संयमाने वागण्याचा सल्ला दिला. भडकलेले कार्यकर्ते मात्र त्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करतात. आज आपण संखेने अधिक आहोत व काही मिनटात संवर्णानी पाणी पाजण्याची तय्यारी आहे तेंव्हा तुम्ही तशी परवानगी का नाकाराता? असे काही कार्यकर्यानी विचारले तेंव्हा बाबासाहेबांमधील दुर्दर्शी व संयमी पुरुष बोलतो.(Chavdar Tale Satyagraha)

ते म्हणतात “तुम्ही नुसतं महाडवर तुटून पडण्याचं बोलताय, मी उभ्या भारतावर तुटून पडण्याचा कार्यक्रम आखलाय. तुम्ही त्या परीने तयारीला लागा. राहिला प्रश्न ईथल्या हल्लेखोरांचा. त्याना आपण कायद्यानी धडा शिकवूया. काही लढाया जग्यावर लढल्याच पाहिजे हे जरुरी नसते. त्या देशव्यापी करत नेऊन अशा पद्धतिने लढायच्या असतात की शत्रूला माघार घ्यायला जागा उरायला नको. नुसतं एका तळ्याचा लढा नाहीये. हा लढा आता इतका व्यापक करत न्यायचा आहे की सारी भारत-भू च एक तळे बनायला हवे. निव्वड महाड्च्या संवर्णाना धडा शिकवायचा नाही तर तमाम भारतीय संवर्णाना आता आमचा अधिकार मान्य करायला भाग पाडायचे आहे” असं म्हणून बाबासाहेबांनी भडकलेल्या समाजबांधवांची समजूत काढली व त्यांना शांत केले.यानंतर लोकं शांत होतात अन एकदाचं मोठं संकट टळलं.

आता कार्यकर्त्यानी परत एकदा महाड सोडण्यास सुरुवात केली. पण बाबासाहेब मात्र महाड सोडून जात नाहीत. त्यांची डॉक बंगल्याची मुदत संपल्यामुळे ते टिपणिसांकडे मुक्काम हलवितात. अन सगळा मामला शमवून नि मार्गी लावून २३ मार्च १९२७ ला मुंबईस परत येतात. दरम्यान तमाम हल्लेखोरांवर खटले भरण्यात येतात व केस चालविली जाते. या खटल्यात ८ जातियवादी गुंडावर आरोप सिध्द होतो. ६ जुन १९२७ ला न्यायालयाचा निकाल येतो, अन त्या प्रमाणे वरील सर्व आरोपिना प्रत्येकी ४ महिन्यांचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात येते. परत एकदा अस्पृश्यांच्या वस्तित जल्लोष होतो…..


ॲड. एम डी रामटेके (फेसबुक वरून साभार)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय