Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीविशेष लेख : अमृतलाही पैजा जिंकायला लावणारी मराठी भाषा!

विशेष लेख : अमृतलाही पैजा जिंकायला लावणारी मराठी भाषा!

विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच सबंध महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज . त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. ते एक महान मराठी कवी, नाटक, उपसंपादक आणि कथालेखक सुद्धा होते. त्यांना पद्मभूषण त्याचबरोबर बरेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठी साहित्याच्या कार्यक्षेत्रातील कामकाजाचा आणि कार्यक्षमतेचा त्यांनी आढावा घेतला म्हणून त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषा दिवस फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश यांमधील काही भागांमध्ये साजरा केला जातो.

मराठी ही एक इंडो-आर्यन भाषा आहे. जी महाराष्ट्रात अधिकृत भाषा म्हणून ओळखली जाते .सुमारे 75 दशलक्ष मूळ भाषे यांसह जगातील ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आणि जगातील तिसऱ्या क्रमांकावरिल सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे .विष्णू वामन शिरवाडकर यांनी मराठी भाषा विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कुसुमाग्रजांनी आपल्या कारकिर्दतील पाच दशके मराठीची सेवा केली. या काळात असंख्य लघुकथा ,कादंबऱ्या, नाटके ,निबंध, कविता त्यांनी सादर केल्या.1942 मध्ये स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी कविता” विशाखा” ही सर्वात सुंदर कामांमधील एक कविता आहे. ती आजही भारतीय साहित्याचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून ओळखली जाते.

मराठी भाषा दिवस हा प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता जागृत करण्याचा दिवस आहे. या दिवशी शैक्षणिक संस्थांमध्ये संमेलने, निबंध तसेच महाराष्ट्र शासन दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. मात्र मागील काही वर्षात कोरोना महामारी मुळे काही कार्यक्रम घेता आले नाहीत .यावर्षी महाराष्ट्र शासन मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे.

– रत्नदिप सरोदे, बारामती 

( मुक्त पत्रकार)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय