Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : समतेचा विचार सर्वांनी मिळून टिकवणे काळाची गरज - डॉ.बाबा आढाव

Pune : समतेचा विचार सर्वांनी मिळून टिकवणे काळाची गरज – डॉ.बाबा आढाव

मातंग समाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब सोनवणे यांचा नागरी कृतज्ञता सन्मान

पुणे : फुले, शाहू, आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे अण्णा भाऊ साठे यांनी समाजाच्या कल्याणासाठी दिलेला समतेचा विचार आज हरवत चालला असून आज समाजातील सर्वांनी मिळून तो विचार टिकवणे काळाची गरज असल्याचे मत जेष्ठ कामगार नेते व विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. PUNE NEWS

दलित चळवळीचे व मातंग समाजाचे अभ्यासक, नेते भाऊसाहेब सोनवणे यांच्या नव्वदी निमित्त त्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा आढाव यांच्या हस्ते पार पडला तेव्हा ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, भाऊसाहेब सोनवणे यांनी मातंग समाजासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.असे समाजासाठी झटणारे व त्याग करणारे कायकर्ते आज पुन्हा नव्याने घडले पाहिजे. असे म्हणून त्यांनी सोनवणे यांच्या कार्याचा गौरव केला. PUNE NEWS

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय