Friday, October 18, 2024
Homeताज्या बातम्याPCMC:स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दैदीप्यमान विचार हे आजही पथदर्शक आहेत.-सुनील देवधर

PCMC:स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दैदीप्यमान विचार हे आजही पथदर्शक आहेत.-सुनील देवधर

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ,निगडी यांच्या तर्फे सावरकरांच्या आत्मार्पण दिनी दिला जाणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण सोहळा’ सलग १६व्या वर्षी मोठ्या जल्लोषात पार पडला.

फुटीरतावाद आणि धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलेल्या मिझोराम राज्यामध्ये स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी शुभान फौंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. राज्याचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन तिथे शेती, अन्न प्रक्रिया, फलोत्पादन, हस्तकला यांच्या माध्यमातून स्थानिकांना हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या शुभान फौंडेशन, मिझोराम या संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार (रु. १ लक्ष व स्मृतिचिन्ह) देऊन गौरविण्यात आले.

त्याच बरोबर गेल्या तीन दशकाहून अधिक काळ कोल्हापूर आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता,व्यक्तिमत्व विकसन, महिलांवरीलअन्याय निवारण व सबलीकरण तसेच आरोग्य विषयक कार्य करीत महिला, महिला नव उद्योजकासाठी काम करणाऱ्या आणि महिलांच्या व्यवसाय वाढीचे एक अग्रगण्य व्यासपीठ म्हणून नावारूपाला आलेल्या, महिला सक्षमीकरणांमध्ये संपूर्ण राज्यात आदर्श निर्माण करणाऱ्या कोल्हापूरच्या स्वयंसिद्धा संस्थेला स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय पुरस्काराने (रु. ५१ हजार व स्मृतिचिन्ह) गौरविण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दैदीप्यमान विचार काल,आज व उद्याही सर्वांसाठी पथदर्शक आहेत. सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची ज्वाला भारतीयांमध्ये निर्माण केली. त्यामुळे त्यांचे विचार आणि तत्वज्ञान हे सदैव भारतीयांना चेतना देत राहतील, सावरकरांनी देशाला बळकट करण्याचे स्वप्न बघितले होते. ते स्वप्न आज पूर्ण झाले असून भारत बलशाली झाला आहे, असे सुनील देवधर यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

पारितोषिक वितरणाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित “हिंदुत्व” आणि “हिंदुराष्ट्र दर्शन” या दोन पुन:र्मुद्रित पुस्तकांचे प्रकाशन सूनील देवधर व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सात्यकी सावरकर यांनी पुस्तकांची ओळख सर्वाँना करून दिली.

कार्यक्रमाला सत्यकी सावरकर कुटुंबिय,शुभान फाउंडेशनचे डॉ. सुभाशिस नंदी डॉ. वेदमणी देवी , स्वयंसिद्धा संस्थेचे तृप्ती पुरेकर,सौम्या तिरोडकर, जयश्री गायकवाड,प्रिया भुयेकर ,आशा थोरवत, पद्मश्री तेरदाळे, मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सावरकर प्रेमी व शहरातील विविध संस्थांचे मान्यवर, मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, मंडळाच्या सर्व विभागाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव सागर पाटील यांनी केले, सूत्रसंचालन संजय भुजबळ यांनी केले. आभार प्रदर्शन सहसचिव राजेंद्र देशपांडे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता अमृता दाते यांनी गायलेल्या संपूर्ण वंदेमातरमने करण्यात आली.

संबंधित लेख

लोकप्रिय