Thursday, May 9, 2024
HomeNewsPCMC:समाजातील संवेदशीलता टिकविण्याचे काम कवींनी केले आहे-तुकाराम पाटील

PCMC:समाजातील संवेदशीलता टिकविण्याचे काम कवींनी केले आहे-तुकाराम पाटील

राज्यस्तरीय प्रेम काव्यमैफल उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:नक्षत्राचं देणं काव्यमंच,मुख्यालय,भोसरी पुणे ३९ च्या वतीने सायन्स पार्क चिंचवड येथे राज्यस्तरीय प्रेम काव्यमैफल व फुलोरा प्रेमाचा या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी कवी वादळकार यांच्या “प्रेम क्लिनिक” या थिएटर शो च्या कवितांचा कार्यक्रमही संपन्न झाला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व गझलकार प्रा.तुकाराम पाटील होते.उद्घाटक समाजसेवक सुभाष चव्हाण उपस्थित होते.विशेष उपस्थितीमध्ये बोल्ड कवी म.भा.चव्हाण,चित्रकार सुहास जगताप,जया बोरकर,सिराज मुल्लानी,सुनिल जाधव, भाऊसाहेब आढाव, यशवंत घोडे इत्यादी अनेक मान्यवर  यावेळी उपस्थित होते.

वृक्षाला पाणी घालून आगळ्यावेगळ्या पद्धतीने पर्यावरण संदेश देत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेस मान्यवरांना शाल,पुस्तक, गुलाबपुष्प  व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम पाटील म्हणाले की,”नक्षत्रांच देणं काव्यमंच”ही संस्था कवींच्या हक्काच्या आणि सन्मानासाठी गेले २४ वर्ष सातत्यपूर्ण काम करत आहे.सातत्यपूर्ण धडपड करणारी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी ही कार्यक्षम संस्था आहे.कवींना न्याय देण्यासाठी आणि कवितेची मशागत करण्यासाठी अशा व्यासपीठाची समाजाला गरज आहे,समाजाने कवीला जपले पाहिजे. या कवितेची साधना मोठ्या स्वरूपात होण्याच्या दृष्टीने संस्था काम करत आहे. एक तास कवितेचा कवी तुमच्या भेटीला…या उपक्रमातून नवं कवी घडतील अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
समाजातील संवेदशीलता टिकविण्याचे काम कवींनी केले आहे,जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन आपण माणूस म्हणून जगणे स्वीकारले पाहिजे.अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली

कार्यक्रमाचे  उद्घाटक  समाजसेवका सुभाष वाल्हेकर याप्रसंगी म्हणाले की ‘”कवीच्या कविता या पुस्तकात न राहता,वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे.यासाठी संस्थेने काव्यसंग्रह प्रकाशन आणि एक तास कवितेचा हा जो उपक्रम राबवला आहे.यातून नक्कीच कवींची प्रतिभा फुलत राहणार आहे. काव्य कार्यक्षमता वाढत राहणार आहे.भविष्यामध्ये नामवंत कवी या व्यासपीठाने व्यासपीठावर घडतील अशी मला अपेक्षा आहे.”

विशेष अतिथी बोल्ड कवी म.भा.चव्हाण म्हणाले की,”कवींनी आपली प्रतिभा ही जागृत ठेवून, प्रेमाचा आविष्कार हा नेहमी करत राहावा. ज्याला प्रेयसीचा स्पर्श झाला आहे.त्याची आयुष्याची बाग फुलली आहे.म्हणून या राज्यस्तरीय प्रेम काव्य मैफलमध्ये प्रेमाच्या विविध कवितांचा सादरीकरण झाले.आणि एक प्रकारे सुंदर अशा प्रकारची प्रेमाची अनुभूती मला या ठिकाणी मिळाली आहे.”
या कार्यक्रमात सहभागी कवीना फोर कलर सन्मानपत्र,गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
पद्माकर वाघरुळकर,अशोक वाघमारे,अनुराधा इंगवले, नितीन भोसले,विलास कुंभार,शांताराम सोनार,सरदार मनोज,बबन चव्हाण,दत्ताञय भोसले,कमल आठवले,प्रशांत निकम,आनंद गायकवाड,संभाजी रणसिंग,बशीर मुलाणी,भरत जोशी,अशोक सोनवणे ,प्रतिभा किर्ती कर्वे इ. नी कवितांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी केले,आभार प्रदर्शन कवी यशवंत घोडे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन जोगदंड,भाऊसाहेब आढाव, यशवंत घोडे,डॉ.गिरीश सपकाळ,मनोज सरदार यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय