प्रतिनिधी :- अंंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत राज्यपालांनी भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे, असे गव्हर्नर ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट करण्यात आले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल असे कळविले आहे.
— Governor of Maharashtra (@maha_governor) June 2, 2020
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल असे कळविले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल असे त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द बाबताची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असली तरी आता राज्यपाल काय करता यावर बरेच काही अवलंबून आहे.