पुणे-पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात होऊन ४८ गाड्या एकमेकांवर आदळल्या.
या अपघातात ३५ जण जबर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.
रात्री पावणे नऊ च्या सुमारास हा अपघात झाला.अपघातानंतर रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला
आणि वाहने एकमेकांवर आदळली.
पुणे मनपा,पीएमआरडीएच्या मदत पथकाने तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे.