Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यWHOने मीठ खाण्याविषयी जाहीर केली महत्त्वाची गाईडलाइन, यापेक्षा जास्त मीठ खाल्यास भोगावे...

WHOने मीठ खाण्याविषयी जाहीर केली महत्त्वाची गाईडलाइन, यापेक्षा जास्त मीठ खाल्यास भोगावे लागणार दुष्परिणाम!


नवी दिल्ली : WHOने देशभरात सोडियम अर्थात मीठाच्या वापरासाठी नवीन मानक जारी केले आहेत. संस्थेने अशी शिफारस केली आहे की प्रत्येक व्यक्तीने दररोज फक्त इतक्या ग्रॅम मध्येच मिठाचे सेवन करावे.

यात काहीच शंका नाही की मिठाशिवाय अन्न एकदम बेचव लागते पण तुम्ही कधी विचार केला आहे का जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे काय होते? WHOच्या नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातअसे दिसून आले आहे की जास्त प्रमाणात मीठ खाल्याने दरवर्षी ३ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. आता ही संख्या कमी करण्यासाठी संस्थेने लोकांना दिवसातून फक्त 5 ग्रॅम मीठ खाण्यास सांगितले आहे. यासह अन्न वातावरण सुधारण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी 60 पेक्षा जास्त खाद्य श्रेणींमध्ये सोडियमच्या पातळीसाठी नवीन मानकं तयार केली गेली आहेत.

असे मानले जाते आहे की या बेंचमार्कमुळे 2025 पर्यंत मीठाचा वापर 30 टक्क्यांनी कमी होईल. WHOच्या म्हणण्यानुसार आपण सर्वजण आवश्यकतेपेक्षा दुप्पट मीठ खात आहोत. तज्ञांच्या मते, आपल्या शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन आवश्यक असते. कमी पोटॅशियमसह जास्त सोडियमचे सेवन केल्याने आरोग्यास हानी पोहचू शकते. अन्नामध्ये मीठ जास्त असल्यास रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो यामुळे हाडे देखील कमजोर होतात.

निरोगी प्लाझ्मा तयार करण्यासाठी आणि मज्जातंतूचे आरोग्य सुधारण्यासाठी मिठाचं सेवन आवश्यक मानले जाते. हे प्रोसेस्ड फूड, पाकिटबंद पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये अधिक आढळते. तथापि मसाले आणि चटपटीत पदार्थांमध्येही याचे भरपूर प्रमाण आढळते. डब्ल्यूएचओच्या (WHO) आकडेवारीनुसार, बहुतांश लोक दररोज सरासरी 9 ते 12 ग्रॅम मिठाचे सेवन करतात. संस्थेने असा अंदाज लावला आहे की मिठाचा वापर शिस्तबद्ध पातळीवर कमी केल्यास जागतिक पातळीवर 2.5 मिलियन मृत्यू रोखता येऊ शकतात.

                            

नवीन बेंचमार्कमागील खरे कारण

संस्थेच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 60 हून अधिक खाद्य श्रेणींमध्ये सोडियमच्या पातळीसाठी ठरवलेली मानके देशांना मिठाचे सेवन कमी करण्यास आणि लोकांचे जीवन वाचवण्यास मदत करतील. ज्या ठिकाणी प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात त्या ठिकाणी सोडियमचे सेवन कमी करणे ही संस्थेची कल्पना आहे. अमेरिकन ग्राहक अ‍ॅडव्होकेसी ग्रुप आणि जनतेच्या हितासाठी विज्ञान केंद्राद्वारे जाहीर केले आहे.

मिठाचे फायदे व दुष्परिणाम

आपल्या सर्वांना हे माहित आहे की मीठ हा आपल्या रोजच्या आहाराचा एक आवश्यक भाग आहे. त्याशिवाय प्रत्येक जेवण अपूर्ण आहे. त्याच्या सेवनाने शरीरास कार्य करण्यास मदत करते. हे केवळ शरीराला हायड्रेटेडच ठेवत नाही तर थायरॉईडला योग्यप्रकारे कार्य करण्यास देखील मदत करते. एवढेच नव्हे तर ज्या लोकांना लो बीपीची समस्या असते त्यांच्यासाठी मीठाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. हे सिस्टिक फायब्रोसिसची लक्षणे सुधारते. पण जर ते जास्त प्रमाणात घेतले तर कळत-नकळत आरोग्यास मोठे नुकसान होऊ शकते. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, उच्च बीपी आणि किडनीचे आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो.

मिठाविषयी गैरसमज

संस्थेने मिठाच्या अभावाबद्दल काही समज व गैरसमजांविषयी देखील स्पष्टीकरण दिले आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की घाम आल्यानंतर मीठ जास्त प्रमाणात खावे पण हे पूर्णत: चूकीचे आहे. कारण घाम आल्यानंतर फक्त हायड्रेशनची आवश्यकता असते. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने कोणत्याही वयातील व्यक्तीचा रक्तदाब वाढू शकतो.

फूड कॅटेगरीज व सोडियमची मात्रा

WHOने वेगवेगळे पाकिटबंद व प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ जसं की पाकिटबंद ब्रेड, चटपटीत किंवा नमकीन स्नॅक्स, मांस खाद्यपदार्थ आणि पनीर यासारख्या सामग्रीमधील सोडियमचा बेंचमार्क ५ मे रोजीच प्रकाशित केला आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार, 100 ग्रॅम बटाटा चिप्समध्ये जास्तीत जास्त 100 ग्रॅमच सोडियम असले पाहिजे. तर पाई आणि पेस्ट्रीमध्ये 120 ग्रॅम पर्यंत आणि प्रक्रिया केलेल्या मांसमध्ये 30 मिलीग्रॅम पर्यंतच सोडियम असणं चांगलं आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय