Saturday, May 18, 2024
HomeNewsप्रत्येक निवडणुकीत त्याच त्या आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्यांना मतदार धडा शिकवतील-राहुल कलाटे

प्रत्येक निवडणुकीत त्याच त्या आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्यांना मतदार धडा शिकवतील-राहुल कलाटे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: अनधिकृत बांधकामे नियमितीकरण शास्ती कर माफी हे भाजप राष्ट्रवादीने लोंबकळत ठेवलेले प्रश्न आहेत.
कलाटे यांनी म्हटले आहे की, गेल्या चार दिवसात शहरात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी शहरात प्रचारासाठी येऊन घोषणांचा पाऊस पाडला आहे. 24 तास पाणी, निगडी ते पिंपरी मेट्रो , ट्रान्सपोर्टेशन रस्ते, अनधिकृत बांधकामे नियमित करू, शास्तीकर माफ करू अशा अनेक घोषणांचा समावेश आहे.राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते त्यांच्याच कार्यकाळात अनधिकृत बांधकामांवर शास्ती कर लादला गेला त्यावेळी पिंपरी चिंचवड मधील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे व विलास लांडे हे या शहराचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र त्यावेळी विधानसभेत यातील एकानेही शास्तीकरास विरोध केला नाही.दरवेळी लोकसभा,विधानसभा,महापालिका निवडणुकीत पुन्हा त्याच घोषणांचा पाऊस पाडला जातो.

अशी टीका अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की,राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते त्यांच्याच कार्यकाळात अनधिकृत बांधकामांवर शास्ती कर लादला गेला त्यावेळी पिंपरी चिंचवड मधील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे व विलास लांडे हे या शहराचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र त्यावेळी विधानसभेत यातील एकानेही शास्तीकरास विरोध केला नाही.मी भूमिपुत्र आहे.चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत म्हणून शिट्टी या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या कलाटे यांनी महाविकास आघाडी व भाजपवर हल्लाबोल केला आहे.

भाजपच्या घोषणा हास्यास्पद आहेत

सन 2014 च्या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न सोडविण्यात आघाडी सरकारला अपयश आल्याचे सांगून लोकसभेला शेकापतर्फे निवडणूक लढवली अपयश आल्यानंतर ते विधानसभा निवडणुकीत भाजपावासी झाले. मात्र अजूनही अनधिकृत बांधकामे व शास्ती कराचा प्रश्न सुटलेला नाही. दिवंगत आमदार जगताप यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत हा प्रश्न सोडविण्याची घोषणा भाजप करत आहे हे खरे तर हास्यास्पद आहे.असे राहुल कलाटे म्हणाले.

महापालिकेत त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले. स्वच्छ कारभाराचे वचन देऊन पालिकेत सत्ता मिळवली. मात्र पदाधिकारी पोसून टक्केवारी गोळा करण्यात भाजपला रस होता. गेल्या पाच वर्षात टेंडरवरच अधिक खर्च झाला .मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अपयश आले.

शहरवासीयांना 24 तास पाणी देण्याची घोषणा केली गेली .मात्र दिवसाआड पाणी तेही अनेक भागात कमी दाबाने मिळत आहे .टँकर लॉबी जोरात आहे. भामा आसखेड व आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या योजनेत भ्रष्टाचार झाला. जॅकवेल प्रकरणात 30 कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा झाली. यात जनतेच्या पदरात मात्र काहीच पडले नाही. वैद्यकीय विभागाने तर अकार्यक्षमतेचा व भ्रष्टाचाराचा कहर केला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय