Monday, May 20, 2024
Homeराजकारणधक्कादायक : वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांना मारहाण

धक्कादायक : वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांना मारहाण

नेवासा : काही दिवसांपूर्वीच श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे शेळी चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित मुलांना झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. नागरिकांच्या रस्त्याचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार संजय बिरादार हे नेवासा फाटा येथे वादातील रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तहसीलदार संजय बिरादार यांच्यावर एका गटाने हल्ला चढवत मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असतानाही मारहाण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी ही घडली आहे.

तहसीलदार संजय बिरादार यांना मारहाण केल्याप्रकरणी सत्यजित घुले, करणसिंह घुले असं आरोपींचं नाव असून त्यांच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा फाट्यावरील तारा पार्क परिसरातील रहिवाशांच्या रस्त्याचा वाद सुरू आहे. सत्यजित घुले, करणसिंह घुले यांनी या नागरिकांचा रस्ता बंद केल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. सदरचा रस्ता आपल्या मालकीचा असून खासगी जागेतून बेकायदेशीरपणानं तो काढला गेल्याचा घुले कुटुंबाचा दावा आहे. याबाबत वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार संजय बिरादार हे गेले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय