Photo : Facebook |
मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईत वाहतूक कोंडीमुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट होत असल्याचा आज दावा केला, या वक्तव्य आता विविध प्रतिक्रिया येत आहेत.
शिवसेनेच्या कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या
अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना “मुंबईत ३ टक्के घटस्फोट वाहतूक कोंडीमुळे होतात, असा अनोखा दावा केला आहे. त्या म्हणाल्या कि, मुंबईत ट्रॅफिक जॅममुळे लोक वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना वेळ द्यायला मिळत नाही. त्यामुळे मुंबईत ३ टक्के घटस्फोट वाहतूक कोंडीमुळे होतात. या वर शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी ट्वीट केले आहे कि, मामींचा नवा शोध : मुंबईतील ट्राफिकमुळे 3 टक्के डीवोर्स (घटस्फोट) होतात. उत्तनच्या म्हाळगी प्रबोधिनीत भाजप कसले बौद्धिक घेते? कधी तरी मामीलाही बोलवा. असे ट्वीट करत टोला लगावला आहे.
मामींचा नवा शोध : मुंबईतील ट्राफिकमुळे 3 टक्के डीवोर्स (घटस्फोट) होतात. उत्तनच्या म्हाळगी प्रबोधिनीत भाजप कसले बौद्धिक घेते? कधी तरी मामीलाही बोलवा.#AmrutaFadnavis #BJP #Shivsena @fadnavis_amruta @ShivsenaComms @AUThackeray #Mumbai #Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/IrWW4GMWrE
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) February 4, 2022
तर हा जावई शोध कुठून लावला तसेच, मुंबईची प्रतिमा मलिन करण्याचे काम कुणी करू नये असे मुंबईच्या महापौर किशोरी पेंडेकर म्हणाल्या.
ब्रेकिंग : कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, त्या प्रकरणाची करणार चौकशी