(प्रतिनिधी) :- राज्यात आज 3 हजार 214 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 1 लाख 39 हजार 010 अशी झाली आहे. आज नवीन 1 हजार 925 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 69 हजार 631रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 62 हजार 833 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
रुग्णांसाठी आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन ॲन्टीजन टेस्टींग, टेलिक्सरे तसेच ॲन्टीबॉडीज टेस्टींग या तंत्रज्ञानाचा वापर करुन कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात यावेत.जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताचा मत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.2/2
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 23, 2020
रुग्णांसाठी आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन ॲन्टीजन टेस्टींग, टेलिक्सरे तसेच ॲन्टीबॉडीज टेस्टींग या तंत्रज्ञानाचा वापर करुन कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात यावेत. जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताचा मत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. जालना येथे कोरोना पार्श्वभूमीवर बैठक घेतली. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असुन ही अतिशय चिंतेची बाब आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.