Sunday, May 12, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य : अभंग - कवी योगेश बोऱ्हाडे

जनभूमी साहित्य : अभंग – कवी योगेश बोऱ्हाडे

अभंग


घे गोड मानुनी नाम तुझे…

पाऊली चालती पंढरीची वारी

नामाचा गजर बोले श्रीहरी,

मुखी यावे नाम तुझे पांडुरंगा

किती नाम तुझे गोड… 

अवघे म्हणे विठ्ठला धाव धाव सख्या रे

राबतो भक्तांसाठी माझी विठू माऊली, कारे रोखली वारी पंढरीची

अवघे जन नाम घेता तुझे वारकरी..

कोरोणाच्या संकटाला दे रे दूर लोटूनी

धाव धावरे भक्तांच्या पंढरीसाठी,

कुठे गेली तुझी भक्तांवरची सावली

कोण मारी त्यांच्या संकटाची चाहूल…

कधी संपले रे ही महामारी

किती पहाशील रे पांडुरंगा अंत,

नाही औंढा कोणी तुझ्या दारी

घे मानुनी नाम तुझे गोड..

कवि.योगेश बोऱ्हाडे

देवळे, जुन्नर, पुणे..

फो. 9834516144


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय