Sunday, May 19, 2024
Homeराजकारणउद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना भेटून आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ट्वीटरद्वारे त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे. या ट्वीट मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले नाही. मात्र ते महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांकडेच बोट दाखवत असल्याचे मानले जात आहे.

ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो. असे ट्वीट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबातील जवळचे मित्र एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून बहुतांश आमदारांना आपल्या बाजूने घेतल्याने उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे देखील पुर्वी शिवसेनेत होते, २००६ मध्ये त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली होती.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय