पुणे : नुकत्याच येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीला चांगलेच झोडपले असताना आता पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद आणि जालना या ठिकाणी ता. २४ व २५ हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
IMD GFS च्या मॉडेल नुसार, येत्या २,३ दिवसात मध्य महाराष्ट्रातील घाटभागात मध्यम ते जोरदार पावसाची श़क्यता. पुणे,सातारा, नाशिक, कोल्हापूर?? चित्रात रविवारची स्थिती दर्शवत आहे.
कृपया IMD चे अपडेट पाहत रहा. pic.twitter.com/fmaEWq7ADe
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 22, 2021
तसेच दोन-तीन दिवसात मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
दरम्यान, लवकरच मान्सूनचे देखील आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.