Saturday, May 4, 2024
HomeNews१३ सप्टेंबर जागतिक आदिवासी अधिकार दिनानिमित्त रायपुरच्या राष्ट्रीय आदिवासी संमेलनासाठी महाराष्ट्रातून हजारो...

१३ सप्टेंबर जागतिक आदिवासी अधिकार दिनानिमित्त रायपुरच्या राष्ट्रीय आदिवासी संमेलनासाठी महाराष्ट्रातून हजारो आदिवासी कार्यकर्ते। रवाना…

नाशिक । सुशिल कुवर

आदिवासी समन्वय मंच भारत व भारतातील आदिवासी समुदाय आयोजित १६ वे “१३ सप्टेंबर जागतिक आदिवासी अधिकार” दिवसानिमित्त राष्ट्रीय संमेलन छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील पंडीत दीनदयाळ ऑडोटोरीयम, सभागृह येथे येत्या १२ व १३ सप्टेंबर रोजी होत आहे. या राष्ट्रीय संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून छत्तीसगड राज्याच्या राज्यपाल महामहिम सुश्री. अनुसुईया उईके या राष्ट्रीय संमेलन ला उपस्थित राहणार आहेत. तसेच अशोकभाई चौधरी गुजरात, डॉ .शांतिकर वसावा गुजरात, निकोलस बारला दिल्ली, पोरलाल खरते, विक्रम परते मध्यप्रदेश , नक्ताराम भील राज्यस्थान, स्टँलिन इंगती आसाम, अरविंद नेताम, प्रा. अशोक बागुल, डॉ. सुनिल पऱ्हाड सह महाराष्ट्राचे इतर आमंत्रित लोकप्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यापूर्वी २०१६ देशाची राजधानी (दिल्ली), २०१७ महाराष्ट्र (नागपूर), २०१८ मध्ये झारखंड (रांची),२०१९ कर्नाटक (म्हैसूर) २०२० गुजरात (भिलोडा),२०२१ आसाम (दीपू ) येथे घेण्यात आले. तर यावर्षाचे राष्ट्रीय संमेलन रायपुर येथे होत आहे. या संमेलनात १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ :३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुढील विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

१. विकासाच्या आधुनिक संकल्पनेत आदिवासी आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन
२. पारंपारिक ज्ञानाचे संरक्षण आणि प्रसारामध्ये आदिवासी महिलांची भूमिका 
३. आदिवासींचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हक्क आणि वास्तविक स्थिती
४. आदिवासींचे पारंपारिक ज्ञान आणि चालीरीतींमधील वैज्ञानिक ज्ञान
५. आदिवासी बोली भाषा साहित्य आणि इतिहास 
६. पेसा कायदा आणि ज्या राज्यात लागू करण्यात आलेला आहे तेथील अंमलबजावणी स्थिती
७. वन अधिकार कायदा आणि अंमलबजावणी
८. राष्ट्रीय आदिवासी धोरणाची सद्यस्थिती
९. भूसंपादन कायदा आदिवासी चे विस्थापन सध्याच्या स्थिती
१०. डिलिस्टिंगवर चर्चा 
११. काही प्रदेशांमध्ये, आदिवासींच्या मूळ यादीत समावेश केलेला नाही यावर चर्चा
१२. भारत सरकार आणि भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय पदोन्नतीमध्ये १००% आरक्षण आणि अनुसूचित क्षेत्रात तृतीय, चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती दृष्टीकोन
१३. आदिवासी महिलांना संपत्तीचे अधिकार मिळणे
१५. ऍट्रॉसिटी कायदा व सध्यस्थिती  १६. जनगणनेत पूर्वीप्रमाणेच आदिवासींसाठी स्वतंत्र स्तंभावर चर्चा १७. देशातील आदिवासींवरील होणारे अत्याचार 
१८. छत्तीसगढ राज्य व इतर क्षेत्रातील  आदिवासी भागातील नक्षल समस्येवर चर्चा.  या  विषयांबरोबरच आदिवासींच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक समस्यांवरही चर्चा केली जाणार आहे.
 
 तसेच १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता विविध राज्यांतून आलेल्या सांस्कृतिक गटांचे सादरीकरण होणार आहे. दिनांक १३ सप्टेंबर रोजी पारंपारिक आदिवासी वेशभूषेत रॅली व त्यानंतर सार्वजनिक सभेत रूपांतर होऊन विविध राज्यांच्या समस्यावर सामूहिक चर्चा करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय संमेलनसाठी महाराष्ट्रातून हजारो बांधव ९ ते १० सप्टेंबर रोजी रायपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी प्रा. अशोक बागुल उत्तर महाराष्ट्र, डॉ. सुनिल पऱ्हाड पश्चिम महाराष्ट्र, हिरालाल भोई पूर्व महाराष्ट्र, प्रा.मधुकर उईके मध्य महाराष्ट्र यांनी दिली आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेने १३ सप्टेंबर २००७ रोजी आदिवासींच्या संरक्षणासाठी ४६ कलमी अधिकार घोषणापत्र जाहीर केलेले आले. या घोषणापत्रात आदिवासींचे अस्तित्व, हक्क, अधिकार, मानवतावादी मूल्ये, जीवनमूल्ये आणि विकासातील सातत्य बघता आदिवासींचे अधिकार काय आहेत,भारतीय संविधानात कोणते विशेष अधिकार बहाल केलेले आहेत यावर विचारमंथन व सामुदाईक ठराव संमत करून शासनास सादर करण्यात येणार आहे.

या अधिकार दिवसाला सर्व आदिवासी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन  राष्ट्रीय स्तरावरून करण्यात आलेले आहे. या संमेलनासाठी नंदुरबार, धुळे,जळगांव, ठाणे, पालघर, नाशिक ,पुणे, नागपूर, गोंदिया, गडचिरोली येथून हजारो कार्यकर्ते रायपूरकडे येत्या ९ ते १० सप्टेंबर दरम्यान रेल्वेने रवाना होत आहेत. यात प्रामुख्याने किसन ठाकरे, रावण चौरे, के.के.गांगुर्डे ,राजेंद्र वाघले, जयवंत गारे, विजय पवार, रतन चौधरी, सुभाष गवळी, चेतन खंबाईत, आनंदराव भोये, विजय घुटे, इंजिनिअर गणेश भोये, प्रा.प्रदीप इम्पाळ, गुलाब आहेर, सुशिल कुवर, विजय घुटे, काशिनाथ बागुल,पद्माकर बागुल, देवेंद्र ढुमसे,सुधाकर देशमुख, सुरेश गावीत, रतन चौधरी,मांगीलाल गांगुर्डे, विलास राठोड, रुख्मिणी गवळी, सरोजताई भोये, भावना पवार /इलपाची, मंगलाताई चौरे, बेबीताई गांगुर्डे, सरला ठाकरे, सुरेखा ठाकरे,सुमन पवार, चित्रा पाडवी, रोहिदास डगळे, शरद जाधव, नानू पाडवी, अशोक भोये,पवन शिरकांडे, गुलाब ठाकरे, शिवाजी पारधी, शांताराम चौधरी, व इतर हजारो प्रमुख कार्यकर्ते यांचा समावेश आहे अशी माहिती किसन ठाकरे यांनी दिलेली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय