Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडतीर्थक्षेत्र आळंदी सह शिरूरचा विकास साधणार – केंद्रीय मंत्री रेणुका सिंग

तीर्थक्षेत्र आळंदी सह शिरूरचा विकास साधणार – केंद्रीय मंत्री रेणुका सिंग

माऊली मंदिरास भेट, श्रींचे दर्शन

आळंदी / अर्जुन मेदन
कर : केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंग यांनी भाजप शिरूर लोकसभा प्रवास योजनेच्या उपक्रमातील दौऱ्यात येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सद्दिच्छा भेट देत श्रींचे दर्शन घेतले. तीर्थक्षेत्र आळंदी सह शिरूर लोकसभेचा विकासात अडचणी सोडविणार असल्याची ग्वाही केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंग यांनी यावेळी वारकरी संप्रदायास दिली.

भाजपचे वतीने आयोजित शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रवास या कार्यक्रामा निमित्त केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंग आळंदीत आल्या होत्या. या निमित्त त्यांनी आळंदीतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आळंदी मंदिरास भेट देऊन माऊलींचे संजीवन समाधीचे दर्शन घेतले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंग यांचे देवस्थानचे वतीने उपव्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांचे हस्ते तसेच महसूल विभागाचे वतीने नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी स्वागत करून सत्कार केला.

ह. भ. प. गोविंद महाराज केंद्रे संस्था ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर येथे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मारुती महाराज कुरेकर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर, संतोषानंद शास्त्री, कल्याण महाराज गायकवाड, विष्णू महाराज केंद्र, पंडित महाराज क्षीरसागर, पुरुषोत्तम महाराज पाटील, नामदेव महाराज चव्हाण, संग्रामबापू भंडारी, भाजपचे जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे, माजी तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, भागवत आवटे, पांडुरंग ठाकुर, अध्यात्मिक आघाडीचे संजय घुंडरे, भाजपचे माजी गटनेते पांडुरंग वाहिले, माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, दिनेश घुले, संतोष गावडे, आळंदी शहराध्यक्ष किरण येळवंडे, ज्ञानेश्वर बनसोडे, आकाश जोशी, सचिन सोळंकर, संकेत वाघमारे, प्रतिम किर्वे, गणेश गरूड, सदाशिव साखरे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. आळंदी मंदिरात श्रींचे दर्शन घेत माहिती घेऊन मंदिरात अभिप्राय देत पुढील कार्यक्रमास रवाना झाल्या.


केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंग यांनी शिरूर लोकसभेतील ह.भ.प., महाराज मंडळी, वारकरी संप्रदायातील गायनाचार्य, मृदूंगमणी मान्यवरांशी श्री ज्ञानेश्वरी मंदिरात सुसंवाद साधला. यावेळी येथील अडीअडचणी समस्यां जाणून घेत विविध विषयावर चर्चा केली. यावेळी येथील शेतकरी, स्वच्छता आणि नमामि गंगा या नदी स्वच्छतेच्या उपक्रम प्रमाणे आळंदी देहू येथून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे स्वच्छतेचे कार्य या आदी केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडविण्यासाठी संबंधितांपर्यंत पोहोचविले जातील असे रेणुका सिंग यांनी सांगितले. यावेळी येथील महाराज मंडळी यांचेशी सुसंवाद साधण्यात आला. येथील तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जोपासण्यासाठी उपाय योजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले. यावेळी येथील स्थानी प्रश्नाची अनेक निवेदने मान्यवरांनी त्यांना सुपूर्द केली.

यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मारुती महाराज कुरेकर, निलेश लोंढे, भाऊ महाराज फुरसुंगीकर, दिलीप महाराज ठाकरे, विष्णू महाराज केंद्रे यांचेसह अध्यात्मिक क्षेत्रातील महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार गायक वादक उपस्थित होते. श्री ह. भ. प. गोविंद महाराज केंद्रे संस्था ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर येथे अध्यात्मिक आघाडीचे वतीने संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

रेणुका सिंग म्हणाल्या, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पवित्र भूमीत येण्याचे भाग्य लाभले. लोकसभा प्रवास तर बहाणा आहे. यानिमित्त माऊलींचा आशीर्वाद, आपला आशीर्वाद घेण्यासाठी पवित्र क्षेत्रात येता आले. महाराष्ट्रात अनेक स्वातंत्र सेनानी घडले, महान संतांचे पवित्र भूमीत येता आले. हे माझे भाग्य समजते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाचे माध्यमातून पुण्यातील शिरूर लोकसभा क्षेत्रात जनतेचा आवाज समस्यां ऐकण्यास मला पाठविले. आपल्या समस्यां समजून घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे पर्यंत iपोहोचविण्याची जबाबदारी मिळाली असून या माध्यमातून अडचणी समजून घेत उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय विकास कामाची माहिती देत भाजपचे सबका साथ, सबका विकास हे ब्रीद घेऊन कार्य सुरु असल्याचे सांगितले. या पवित्र भूमीत आपला कृपाशिर्वाद लाभला हे माझे भाग्य समजते असे सांगत लोकसभा क्षेत्राचे विकासासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील अशी ग्वाही यावेळी बोलताना त्यांनी दिली.

येथील विकास कामाच्या समस्या, शेतकरी विकास, स्वच्छता, नदी प्रदूषण, इंद्रायणी नदीचा विकास आदींवर बोलत त्यांनी संवाद साधला. यावेळी ह.भ,प. मारुती महाराज कुरेकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त करीत कृपाआशीर्वाद दिले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे आदिसह पक्षाचे पदाधिकारी, संत, महंत सुसंवाद बैठकीस उपस्थित होते. चैतन्य महाराज लोंढे, प्रशांत महाराज मोरे, पंडीत कल्याण गायकवाड, संग्रामबापू भंडारे यांनी येथील अडचणी समस्यां यावर मनोगते व्यक्त करीत विकास कामे मार्गी लावण्याची गरज व्यक्त केली.

भारताच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त देशाचे संरक्षण करताना जे वीर शहीद झाले. अशा वीरमाता, वीर पत्नी यांचा सन्मान तसेच युध्दात सहभागी झालेल्या जेष्ठ जवानांचा सत्कार आणि युध्दात ज्यांनी उत्तम कामगिरी केल्या बद्दल भारत सरकारचे वतीने पदक मिळालेल्या जवानांचा सन्मान आणि माजी सैनिकाशी त्यांनी येथील डांगे पंच मंडळ धर्मशाळेत संवाद साधला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, माजी जिल्हापरिषद सदस्य अतुल देशमुख, संजय घुंडरे. आळंदी शहराध्यक्ष किरण येळवंडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते.

आळंदीत स्वातंत्र्याचा अमॄतमहोत्सव उपक्रमांतर्गत आयोजित देशाचे संरक्षण करताना शिरूर लोकसभा मतदारसंघातील तसेच खेड तालुक्यातील जे वीर जवान शहीद झाले अशा कुटुंबीयांचा वीरमाता, वीर पत्नी यांचा सन्मान, तसेंच युध्दात सहभागी झालेल्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच युध्दात उत्तम कामगिरी बजावलेल्या माजी सैनिकांचा व भारत सरकारकडून पदक मिळालेल्या जवानांचा केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रेणुका सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सैनिकांशी सुसंवाद, सैनिकांच्या विविध अडीअडचणी विषयी चर्चा, माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना येणाऱ्या अडचणीवर पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. उपस्थितांना उत्साहात स्नेहभोजन देण्यात आले.

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय