पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: वृक्षमित्र छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते मा.अरुण पवार आणि लोकनियुक्त आदर्श सरपंच मा, बालाजी पवार धाराशिव जिल्हा तालुका तुळजापूर,मोरडा,धारूर यांनी वरुथीनी एकादशी निमित्त आमराईतील पहिल्या बहरांच्या फळांची रास भंडारा डोंगर,देहू पुणे येथे संत तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण केली.तेथे पूजाअर्चा,आरती करून प्रार्थना केली.
यावेळी जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून जात असताना चिंचोली,देहुगाव येथे पाण्याअभावी सुकलेल्या अंदाजे अंदाजे १२० ते १३० झाडांना तातडीने पिंपळे गुरव येथील कार्यकर्त्याना बोलावून टँकरच्या पाण्याचे सिंचन केले.