Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयWaynad : सैन्याने बांधला 30 तासात 190 फूट लांबीचा पूल, वायनाड मधील...

Waynad : सैन्याने बांधला 30 तासात 190 फूट लांबीचा पूल, वायनाड मधील मृतांची संख्या 300 वर

वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाने सर्वत्र विध्वंसक रूप दाखवले आहे. या आपत्तीत 300 हून जास्त लोक मृत्यमुखी पडले आहेत, शेकडो जखमींवर उपचार सुरू आहेत, सर्वत्र जमीनदोस्त झालेल्या इमारती, पडलेल्या भिंती, मोठ-मोठी दगडे या आपत्तीची भीषणता दाखवतात. (Waynad)

केरळचे एडीजीपी एमआर अजित कुमार यांनी सांगितले की,अजूनही 300 लोक बेपत्ता आहेत. केरळचा महसूल विभाग विविध प्रकारे गावागावात माहिती गोळा करत आहे, असे कुमार यांनी सांगितले.

भारतीय सैन्याची मोठी कामगिरी

सैन्य दलाच्या दक्षिण विभागाच्या मद्रास स्यापर्स या इंजिनिअरिंग विभागाने 30 तासात
190 फूट लांबीचा बेली ब्रिज पूर्ण बांधला, त्यामुळे सकाळपासून सुरू झालेल्या 40 पथकांच्या शोध व बचाव कार्याला वेग आला. या ब्रीजमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या मुंडक्कई आणि चोरलमाळा पाड्यांमध्ये खोदाई यंत्रे आणि रुग्णवाहिकांसह अवजड यंत्रसामुग्रीची वाहतूक करणे शक्य होणार आहे.

इथे रुग्णवाहिका आणि इतर वाहने तातडीने तयार ठेवण्यात आली आहेत, शेकडो जखमी आणि मृतांना घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने धावणाऱ्या या रुग्णवाहिका मन पिळवटून काढत आहेत.

वायनाड जिल्हा प्रशासनाने सांगितले की 9328 लोकांना वायनाडमधील 91मदत शिबिरांमध्ये स्थलांतरित केले आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, 327 शवविच्छेदन केले गेले आहेत, ज्यात सापडलेल्या शरीराच्या भागांचा समावेश आहे.

ब्रिगेडियर अर्जुन सेगन, पॅरा रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटरचे कमांडंट, ANI ला सांगितले की वाहनांची गती सुलभ करण्यासाठी एक पुल पूर्ण झाला आहे. “आम्ही ज्या क्षेत्रात उभे आहोत ते दरड कोसळणारे ठिकाण आहे, यापुढे 500 मीटर अंतरावर वस्ती आहे आणि त्यानंतर वनक्षेत्र आहे… हे क्षेत्र प्रवेश करण्यास कठीण होते,” असे ते म्हणाले. Cl 24 बेली पुल – चूर्लमला आणि मुण्डक्काईला इरुवानीप्झा नदीवर जोडणारा – बचाव पथकांना सहाय्य करण्यासाठी अत्यंत वेगाने बांधला गेला आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् म्हणाले की, मुख्य प्राथमिकता आता गायब व्यक्तींचा बचाव आहे आणि पुनर्वसन लवकरात लवकर सुरू केले जाईल. हवामान विभागाने वायनाड जिल्ह्यात शनिवारपर्यंत ऑरेंज अलेर्ट जारी केले आहे. पावसाच्या तासांदरम्यान आकाश स्पष्ट असू शकते. (Waynad)

वायनाड मध्ये हा मोठा झालेला अतिप्रचंड विध्वंस याची भूशास्त्रीय कारणे शोधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तसेच तज्ञ लोकांची समिती काम करणार आहे, केरळ येथे १९८४ तसेच मागील काही दशकात भुसखलन झाली आहेत, मात्र इतके मोठे भयंकर संकट कोणालाही अपेक्षित नव्हते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

संबंधित लेख

लोकप्रिय