झी युवा मराठी वाहिनीवर कीर्तनातून आदिवासींना नरभक्षक म्हणत आक्षेपार्ह विधान केले आहे. आदिवासी समाजाच्या भावना दुखवल्याचे मत आदिवासी संघटनांनी केली आहे. आदिवासी माणसे मारून खातात असे वक्तव्य शंकर महाराज शेवाळे यांनी कीर्तनातून केले. त्यामुळे त्यांच्यावर आदिवासी जमात अन्याय अत्याचार कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आदिवासी संघटना बिरसा ब्रिगेड तसेच राया ठाकर यांनी यावेळी जुन्नर तहसीलदारांना निवेदन देत केली आहे. यावेळी बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे कार्याध्यक्ष शुभम भवारी तसेच उपाध्यक्ष संजय भांगे यांचा समावेश अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.