Mamata Banerjee : नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा आज रविवारी (9 जून) होणार आहे. मात्र, मोदी सरकारच्या शपथविधीपूर्वी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मोठा दावा केला आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी थांबा, काही दिवसांनी देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल असा दावा करत सरकारे कधी कधी एक दिवस टिकतात अशी टीका एनडीए आघाडीवर केली आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, भाजपचे अनेक नेते काही दिवसांतच पक्ष सोडू शकतात. भाजपचे नेते खूप नाराज आहेत. हे सरकार फार काळ टिकणार नाही. असा दावा केला आहे. नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) शपथविधी सोहळ्याला तृणमूल काँग्रेस उपस्थित राहणार की नाही या प्रश्नाला उत्तर देताना सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्हाला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले नसून त्या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. त्यापुढे म्हणाले की, देशाला बदलाची गरज आहे, आम्ही राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सीएएबाबत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की CAA रद्द करावा लागेल. ही मागणी आम्ही संसदेत मांडणार आहोत. मला माफ करा, पण मी असंवैधानिक, बेकायदेशीर पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी शुभेच्छा देऊ शकत नाही. माझ्या शुभेच्छा देशासाठी असतील.


हेही वाचा :
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट
कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर
मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात
ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब
मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !
लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !
साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत