Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उमेदवारी संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे. रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराबाबतचा सस्पेंस आता संपला आहे. काँग्रेसने आज या दोन्ही जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना रायबरेलीच्या जागेसाठी उमेदवारी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रायबरेली आणि अमेठी मतदारसंघाच्या जागेवर कुणाला उमेदवारी देणार याबाबत चर्चा सुरू होती. त्यामुळे या जागांबाबत सस्पेंसही वाढला होतो. अखेर या दोन्ही जागांवर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत, तर किशोरी लाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दोन्ही जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत.
2019 मध्ये अमेठीत Rahul Gandhi यांचा पराभव
2019 मध्ये,अमेठी लोकसभेत भाजप नेत्या स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगला होता. मात्र यात राहुल गांधी यांचा 55,000 मतांनी पराभव झाला. 2004 ते 2019 पर्यंत राहुल गांधी या जागेवरून खासदार होते.
अमेठी आणि रायबरेली जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. रायबरेलीमधून राहुल गांधी आणि अमेठीतून केएल शर्मा आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसने समाजवादी पक्षाला अमेठी आणि रायबरेलीच्या उमेदवारांची माहिती दिली आहे. काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली येथील स्थानिक सपा अधिकाऱ्यांना उमेदवारी अर्जात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे
सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून खासदार होत्या. फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर गेल्या आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी राज्यसभेच्या खासदारपदाची शपथही घेतली होती. आता त्यांच्या जागी राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


हे ही वाचा :
‘हिंदू विधि झाले नसल्यास ते लग्न ग्राह्य धरले जाणार नाही’ सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
कोरोना लसीचे साईड इफेक्ट; लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला, चर्चेला उधान
‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश
ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक
निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न