पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने शासकीय सुट्टी जाहीर करून मंत्रालयाच्या प्रवेशद्वारात अण्णा भाऊ साठे यांचे तैलचित्र लावा, अशी मागणी युवराज भगवान दाखले समन्वयक, सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई मंत्रालयात प्रवेश द्वारात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, व राजर्षी शाहुमहाराज यांची तैलचित्रे दर्शनीय बाजूला लावण्यात आलेले आहेत. अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रेसर काम होते, रशियामध्ये डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारून सन्मान करण्यात आला आहे.
आपल्या देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात अण्णा भाऊ साठे थोड्याफार प्रमाणात सन्मानापासुन वंचित राहिले आहेत. आपण तात्काळ दखल घेऊन मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर दर्शनीय बाजुस साहित्यरत्न शिवशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र लावुन त्यांना कायम स्मरणात व युवापिढीला आदर्श जतन करण्यासाठी मदत होईल, असे युवराज दाखले यांनी निवेदनात म्हटले आहे.
लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू
कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा
महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या

