Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आजच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या टॉप चार बातम्या वाचा एका क्लीक वर

---Advertisement---

१. देशात सात वर्षांत साक्षरता वाढली

     एनएसओच्या अहवालानुसार, राष्ट्रीय पातळीवरील साक्षरतेचे प्रमाण 77.7% आहे.  साक्षरता दर खेड्यांमध्ये 73.5% आणि शहरांमध्ये 87.7% आहे.  २०११ मध्ये साक्षरतेचे प्रमाण 69.3 % होते.  म्हणजेच, देशातील साक्षरतेचे प्रमाण सात वर्षांत 8.4% वाढले आहे.  यात पुरुष साक्षरता 84.7% आणि महिला साक्षरता 70.3% आहे.

---Advertisement---

 साक्षरतेचे प्रमाण केरळमध्ये 96.2 टक्या सहित देशात सर्वाधिक आहे तर सर्वात शेवट 66.4 टक्क्यांसह आंध्रप्रदेश हे राज्य आहे.

 २. पॉलिटेक्निक प्रवेशात ”ई-स्क्रूटनी” योग्य सिद्ध झाली

      कोरोना संक्रमणामुळे प्रभावित शिक्षण प्रणाली सतत अद्ययावत होत राहिली आहे. राज्य व उच्च तंत्रशिक्षण विभाग (डीटीई) विविध उपक्रम राबवित आहेत.  पॉलिटेक्निकची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया म्हणजेच ‘ई-स्क्रूटनी’ हादेखील याचाच एक भाग आहे.  प्रवेश प्रक्रियेमध्ये ई-छाननी सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीपासून कागदपत्रांच्या पडताळणीपर्यंत ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. 10 ऑगस्टपासून जारी केलेली नोंदणी प्रक्रिया 10 सप्टेंबर रोजी संपेल.

 3. अंतिम सेमेस्टर च्या परीक्षा 1 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत

          नागपूर विद्यापीठाने सोमवारी पत्रकार परिषदेत अंतिम वर्षाची आणि बॅकलॉग परीक्षेची सविस्तर रूपरेषा जाहीर केली.  विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार महाविद्यालय / विभाग स्तरावर 15 ते 25 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन / ऑफलाइन पद्धतीने प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे.  यानंतर, 1ते 18 ऑक्टोबर दरम्यान,थ्योरी परीक्षा ऑनलाइन मोडमधील एकाधिक चॉइस प्रश्नांवर (एमसीक्यू) आधारित असेल.  50 टक्के गुण प्रॅक्टिकल आणि 50 टक्के गुण थ्योरी परीक्षा वर असेल आणि याच आधारावर 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर केला जाईल.  विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार एकूण 180 अभ्यासक्रमाचा परीक्षा घेतल्या जातील. यात 63 हजार 540 नियमित व 7 हजार 379 एक्स विद्यार्थी (बॅकलॉग पेपर) असतील.  विद्यापीठ एकूण 1135 प्रश्नपत्रिका तयार करेल.  प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी 150 एमसीक्यूNची बँक तयार केली जाईल. यापैकी परीक्षेत 50 प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांना एकूण 25 प्रश्न सोडवावे लागतील.  प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा असेल.  23 ते 27 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्टही घेण्यात येतील.  विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणास्तव 1 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत परीक्षा देण्यास असमर्थ असल्यास काही दिवसानंतर पुन्हा परीक्षा घेण्यात येईल.

4. एमपीएससी कडून सुधारित वेळापत्रक जाहीर

     

         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)  पदभरतीसाठीच्या तीन परीक्षांचे सुधारित वेळापत्रक सोमवारी जाहीर केले. त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर , दुययम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 22 नोव्हेंबर आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर ला होणार आहे. सुधारित वेळापत्रक आयोगानं संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles