मावळ : संपूर्ण मावळ खोऱ्यात जोरदार पाऊस सुरू आहे. खांडी, कुसवलीसह अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. सुदवडी, जांबवडेसह नव्या नागरी वस्ती मधील रहदारीचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. साई प्रीतम नगरी, सुदवडी ते जांबवडे हा चार किमी चा रस्ता पाण्याखाली गेला आहे.
गेली आठ वर्षे या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण झालेले नाही. येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. गणेश दराडे आणि डीवायएफआय या युवक संघटनेचे कार्यकर्ते पावसु करे यांनी सांगितले की, येथील शेकडो नागरिकांना चाकण, पिंपरी चिंचवड येथे कामावर जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे, या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करा, अशी मागणी पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे करूनही गेली आठ वर्षे दरवर्षी हा रस्ता पाण्याखाली जातो आहे. त्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत.
संपादन – क्रांतिकुमार कडुलकर