Friday, October 18, 2024
HomeNewsराधानगरीतून ४०० क्युसेक विसर्ग सुरू, १ बंधारा पाण्याखाली.

राधानगरीतून ४०० क्युसेक विसर्ग सुरू, १ बंधारा पाण्याखाली.

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १४९.२७ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ४०० तर अलमट्टी धरणातून ३३६१७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील-  इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ५०.११ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ८५.०७३ इतका पाणीसाठा आहे. 

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे :

◆ तुळशी ५४.५९ दलघमी

◆ वारणा ६२२.७२ दलघमी

◆ दूधगंगा ४६९.५५ दलघमी

◆ कासारी ४८.६७ दलघमी 

◆ कडवी ३८.४० दलघमी 

◆ कुंभी ५०.३८ दलघमी

◆ पाटगाव ७३.०४ दलघमी

◆ चिकोत्रा २२.४० दलघमी

◆ चित्री २७.४२ दलघमी 

◆ जंगमहट्टी २३.१८ दलघमी

◆ घटप्रभा  ४४.१५ दलघमी

● जांबरे २३.२३ दलघमी 

◆ कोदे (ल पा) ६.०६ दलघमी

  

बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे : 

राजाराम १३.३ फूट, सुर्वे १६ फूट, रुई ४२ फूट, इचलकरंजी ३९ फूट, तेरवाड ३८ फूट, शिरोळ ३०.३ फूट, नृसिंहवाडी २२.९ फूट, राजापूर १२.९ फूट तर नजीकच्या सांगली ६ फूट व अंकली ५.१ फूट अशी आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय