Tamilnadu : कल्लाकुरिची जिल्ह्यात बेकायदेशीर दारू प्यायल्याने बुधवारी किमान 29 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 60 हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बळी गेलेले बहुतांश रोजंदारी मजूर होते. या सर्वांनी एका विक्रेत्याकडून दारू खरेदी केली होती. यातील काही लोकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. Tamilnadu news
पोलिसांनी यासंदर्भात 49 वर्षीय गोविंदराज उर्फ कन्नूकुट्टी या दारू विक्रेत्याला अटक केली आहे, गोविंदराजकडून पोलिसांनी तब्बल 200 लिटर दारूचे कॅनही जप्त केले आहेत.
कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी जिल्ह्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृती बद्दल ते अहवाल तयार करत आहेत, ही सर्व मजूर कुटुंबे आक्रोश करत आहेत.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कल्लाकुरिचीचे जिल्हा दंडाधिकारी श्रावण कुमार जटावथा यांची बदली करण्यात आली आहे, तर पोलीस अधीक्षक समय सिंह मीना यांना निलंबित करण्यात आले आहे, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.


हेही वाचा :
मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?
मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !
मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण
ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती
वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !
धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ
ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले
NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती
धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ
मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा