(प्रतिनिधी):- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतनं वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. कंगाना राणावतच्या प्रतिक्रिये नंतर बॉलिवूडसह देशभर खळबळ उडाली आहे, त्यामुळे सध्या ट्विटरवर बॉलिवूड मधील अनेक कलाकार ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
त्यामध्ये आलिया भट, कंगना राणावत, करण जोहर, सलमान खान, संजय दत्त, श्रद्धा कपूर, क्रिती सेननं, शाहरुख खान, सोनाक्षी सिन्हा, रणवीर सिंग यांसारखे आणखी काही कलाकार वेगवेगळ्या कारणांसाठी ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
कंगणाने सुशांतच्या आत्महत्येला नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरत त्याच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. पण काही लोकांना त्याच्या आत्महत्येचा वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. ते असं सांगत आहेत की, त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. जो व्यक्ती रँक होल्डर आहे त्याची मानसिक स्थिती कशी बिघडते. त्याच्या मागच्या काही मुलाखती पाहा पोस्ट पाहा ज्यात त्यांनी लोकांना अपील केलं आहे त्याचे सिनेमा पाहण्यासाठी त्यानं हे सुद्धा सांगितलं होतं की, माझे सिनेमा पाहा नाही तर मला या इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं जाईल.
कंगणा पुढे सांगते, छिछोरे सारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमाला एकही अवार्ड मिळत नाही आणि गली बॉय सारख्या सिनेमाला अनेक अवॉर्ड मिळतात. अनेकांनी त्याच्यावर चुकीचे आर्टिकल लिहिले होते. यांना संजय दत्तची व्यसनं दिसत नाहीत पण त्यांनी सुशांतला व्यसनी म्हटलं होतं. अनेक लोक मला मेसेज करतात की, तुझा कठीण काळ आहे तू चुकीचं पाऊल उचलू नकोस. याचा अर्थ असा की, या इंडस्ट्रीतले लोक अशाप्रकारे फिल्मी बॅकग्राउंड नसलेल्या कलाकारांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करतात. सुशांतनं असं खचून जाऊन त्यांना बरोबर आणि स्वतःला चुकीचं सिद्ध करायला नको होतं.