Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

‘वीज बील माफ करा’ अन्यथा आंदोलन करू बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक

---Advertisement---

(आटपाडी) :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन लॉकडाऊन च्या काळात सर्व उद्योग धंदे व रोजगार बंद असुन लोकांचे हाल होताहेत अश्या स्थितीत शासनाने लोकांचे वीज बील माफ करायला हवे होते, परंतु तसे न करता अशा परिस्थितीत महावितरण विभागाने लोकांची विज बिले वाढवून दिली आहेत. 

      शेतकरी कामगार कष्टकरी सर्व सामान्य जनता देशात आणि जगभर आलेल्या कोरोनाच्या वैश्विक महामारीने भरडली गेली आहे. या काळात त्यांना लाॅकडाऊनचा मोठा फटका बसला ‌आहे. त्यांच्याकडे रोजीरोटी चालविण्यासाठी देखिल पैसै नाहीत, मग त्यांनी लाईटबील कसे भरावे असा प्रश्न बळीराजा शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे विचारला आहे. मागील लाॅकडाऊनच्या काळातील सर्व 3 महिन्यातील विज बिले पुढील 15 दिवसात माफ करावी, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे.

---Advertisement---

      यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष डाॅ. उन्मेश देशमुख, जिल्हा युवक उपाध्यक्ष अमित गिड्डे, आटपाडी तालुका अध्यक्ष सुरज पठाण, आटपाडी तालुका युवा अध्यक्ष समाधान जगदाळे, डाॅ. दिगंबर मोरे व आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles