औरंगाबाद:-जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून आता एकूण रुग्णसंख्या ९१०४ इतकी झाली आहे.जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या ७८१ स्वॅबपैकी ३९ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले आहे. आतापर्यंत ५३५५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३६४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे सध्या ३३८५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.आज वाढलेल्या रुग्णांपैकी सिटी एन्ट्री पॉइंटवर केलेल्या अँटिजेंन टेस्टमध्ये ११ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे(कंसात रुग्णसंख्या)
मनपा हद्दीतील रुग्ण:-(२१)
सादात नगर (१), भवानी नगर (१), क्रांतिचौक (१), राज नगर (१), चित्तेगाव (१), मिटमिटा (१), भीमनगर (१), एन चार सिडको (१),मिल कॉर्नर (२),भोईवाडा (१), स्वामी विवेकानंद नगर (७), एन नऊ सिडको (१), जयसिंगपूर (१).
ग्रामीण भागातील रुग्ण:(७)
तेली गल्ली, फुलंब्री (५),लासुर स्टेशन (२) या भागातील रुग्ण आहेत.