Tuesday, June 3, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Edible oil : खाद्य तेल होणार स्वस्त! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

सामान्य लोकांसाठी मोठा दिलासा (Edible oil)

Edible oil – देशात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने कच्च्या पाम तेल, कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील मूळ सीमाशुल्क 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत घटवले आहे. वित्त मंत्रालयाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, हे नवीन दर त्वरित लागू करण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे बाजारातील तेलाच्या किंमतीत घट होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. (Edible oil)

भारताचा आयातीवर अवलंब
सध्या जास्त आहे, भारत आपल्या एकूण खाद्य तेल गरजेपैकी 50 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती भारतात थेट परिणाम करतात. सरकारचा उद्देश तेलाच्या किंमती कमी करणे आणि देशांतर्गत प्रक्रिया उद्योगाचे संरक्षण करणे आहे.

एसईए काय म्हणाले?

खाद्य सचिव संजीव चोप्रा यांच्या मते, सरकारने कच्च्या खाद्य तेलावरील मूळ आयात शुल्क 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणले आहे. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) चे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे कच्च्या पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील एकूण प्रभावी आयात शुल्क (मूळ व अतिरिक्त शुल्क मिळून) 27.5 टक्क्यांवरून 16.5 टक्क्यांवर आले आहे. मात्र रिफाइन्ड तेलांवरील शुल्क अजूनही 35.75 टक्के इतके आहे. (Edible oil)

घरेलू उद्योगाला चालना

SEA आणि इंडियन वेजिटेबल ऑइल प्रोड्यूसर्स असोसिएशन (IVPA) या दोघांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांची मागणी होती की कच्च्या आणि प्रक्रिया केलेल्या तेलांमध्ये शुल्काचे अंतर वाढवावे, जेणेकरून देशांतर्गत रिफायनिंग उद्योगाला चालना मिळेल.

मेहता काय म्हणाले?
मेहता यांनी सांगितले की, “कच्च्या तेलावरील कमी शुल्कामुळे स्थानिक दरात घट होईल आणि ग्राहकांना स्वस्त दरात तेल उपलब्ध होईल. हा निर्णय रिफायनर्स आणि ग्राहक, दोघांसाठीही फायदेशीर आहे.”
ते पुढे म्हणाले की, सध्या रिफाइन पाम तेलाचे आयात प्रमाण अधिक आहे, कारण ते कच्च्या तेलापेक्षा स्वस्त आहे. भारत मलेशिया आणि इंडोनेशियाकडून पाम तेल आयात करतो. (Edible oil)

IVPA चे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनीही सरकारचे आभार मानले आणि हा निर्णय उद्योग व ग्राहक दोघांसाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले.

---Advertisement---

Related Articles

- Advertisement -

Latest Articles