Friday, March 14, 2025

अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

मुंबई(प्रतिनिधी):- राज्यातील कोरोनाची परिस्थिती पहाता सध्यस्थितीत परिक्षा घेणे शक्य नसल्याचे कुलगुरूंंशी बोलल्यानंतर समोर आले आहे. त्यामुळे विद्यापीठातील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यापीठाच्या परिक्षा होणार नसून त्यांना सरासरी गुण दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

         ज्या विद्यार्थ्यांना या गुणांवर आक्षेप असेल, किंवा त्यांना वाटत असेल, की मला यापेक्षाही जास्त गुण मिळाले असते, त्यांना पुन्हा परिक्षा देण्याची संधी महाराष्ट्र सरकारतर्फे दिली जाणार असल्याचे उध्दव ठाकरेंनी सांगितले. 

         त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता मिटलेली असून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles