आळंदी / अर्जुन मेदनकर : बहुसांस्कृतिक एकतेचे प्रतिक म्हणजे अण्णा भाऊ साठे होय. ते मार्क्सवादी होते की आंबेडकरवादी होते, ह्यावर आजही वादविवाद होत आहेत. परंतु माझ्या मते, ते मार्क्सवादी तर होतेच. शिवाय आंबेडकरवादीही होते. मात्र ते खऱ्या अर्थानं मानवतावादी अधिक होते. असे अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. A symbol of multicultural unity is Lokshair Annabhau Sathe – Dr. Shripal Sabnis
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, झोपडपट्टी सुरक्षा दल, व समस्त मातंग समाज आळंदी पंचक्रोशी यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ व्या जयंती निमित्त आयोजित जयंती उत्सवात मार्गदर्शन करताना साहित्यिक श्रीपाल सबनीस बोलत होते.
जयंती निमित्त साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची ग्रंथदिंडी उत्साहात काढण्यात आली. चाकण चौक मार्गे नगरप्रदक्षिणा करीत साहित्य ग्रंथ दिंडी जयंती स्थळी आली. ग्रंथ दिंडीचे पूजन व आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची मिरवणूक प्रसंगी पूजन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष व माजी प्राचार्य नानासाहेब साठे, माजी नगरसेविका मंगला वेळकर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव आण्णा कांबळे, फाउंडेशनचे खजिनदार उद्योजक सुरेश नाना झोंबाडे, स्वागताध्यक्ष शुभम वेळकर, खजिनदार विनोद कांबळे, सामाजिक कार्यकर्ते माऊली पाटोळे, फाउंडेशनचे सचिव सूर्यकांत खुडे आदी उपस्थिती होते.
ग्रंथदिंडी चाकण चौकातुन प्रदिक्षणा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून धाकट्या पादुका मार्गे नियोजित स्मारकाच्या जागेत ग्रंथ दिंडी उत्साहात आली. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, रमेश पाटील, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, माजी उपनगराध्यक्ष अशोक रंधवे पाटील, रवींद्र रंधवे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ग्रंथदिंडीत शालेय मुलांनी वारकरी पोषक करून सहभाग घेतला. सुरसंगम बँजो, समाज बांधव व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
आळंदी व दिघी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी मिरवणुकी दरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवला होता. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थितांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्रावर आधारित कार्याची साहित्याची ओळख करून देत आण्णाभाऊ साठे यांचे विचार आणि कार्य समाजा समोर मांडले. डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मार्गदर्शनास उपस्थितांनी मोठी दाद दिली.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब साठे, माजी नगरसेविका मंगलताई वेळकर, दादासाहेब सोनवणे, संदीपान झोबांडे, भाऊसाहेब आडागळे, लेखक सोपान खुडे, सोपान चव्हाण, अशोक लोखंडे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, सचिन काळे, शिवसेना शहराध्यक्ष अविनाश तापकीर, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, कार्याध्यक्ष बंडूनाना काळे, माजी नगरसेविका रुक्मिणी कांबळे, उद्योजक मंगेश काळे, युवा उद्योजक राहुल चव्हाण, रवींद्र रंधवे, शाहीर नंदुकुमार पाटोळे, विनोद वैरागर, उद्योजक बाळासाहेब झोंबाडे , मंगल हुंडारे, संगीता फफाळ, शंकुतला साठे, शोभा झोंबाडे, सदाशिव कांबळे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, दिनेश कुऱ्हाडे, अनिल जोगदंड, अविनाश राळे, बद्रीनारायण घुगे, जयंती उत्सव समिती स्वागताध्यक्ष शुभम वेळकर खजिनदार विनोद कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या व्याख्याना नंतर प्रसिद्ध गायिका कोमल पाटोळे यांचा गायनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. यास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रम यशस्वीतेस साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशन, झोपडपट्टी सुरक्षा दल, समस्त मातंग समाज पंचक्रोशी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जयंती उत्सव समितीचे सचिव सूर्यकांत खुडे यांनी केले. जयंती उत्सव समितीचे संघटक सुरेश नाना झोंबाडे यांनी आभार मानले.